शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कारखान्यांना नोटीस

By admin | Updated: January 15, 2015 23:29 IST

‘एफआरपी’चा प्रश्न : किसन वीर, प्रतापगडचा अपवाद; साखर आयुक्तांची कारवाई

वाठार स्टेशन : जिल्ह्यातील किसनवीर, प्रतापगड हे कारखाने वगळता उर्वरित सर्व सहकारी, खासगी कारखान्यांना एफआरपी रक्कम न दिल्याबाबत राज्याच्या साखर आयुक्तांनी नोटिसा बजावल्या असून सात दिवसांची मुदत दिली आहे.
यंदाच्या गाळप हंगामात राज्यातील एकूण १७३ सहकारी खासगी कारखान्यांनी गाळप हंगामाचा शुभारंभ केला. यातील अवघ्या १३ कारखन्यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘एफआरपी’प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना दिली. मात्र उर्वरित १६० साखर कारखान्यांनी अद्याप ‘एफआपी’ न दिल्याने या कारखान्यांना साखर आयुक्तांनी सात दिवसांनी मुदत दिली असून या मुदतीत ‘एफआरपी’ रक्कम न दिल्यास तुमची साखर जप्त का करू नये, अशा नोटिसा बजावत कारवाईचा इशारा दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील किसन वीर सहकारी साखर कारखाना, भुर्इंज व प्रतापगड सहकारी साखर कारखाना या दोन कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे उसाची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र जिल्ह्यातील जरंडेश्वर शुगर मिल, कोरेगाव, ग्रीन पॉवर शुगर वर्क्स, प्रा. लि. गोपूज, न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी, श्रीराम (जवाहर) फलटण, जयवंत शुगर कराड, कृष्णा सहकारी साखर कारखाना, कराड, सह्याद्री साखर कारखाना कराड, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना, पाटण, अजिंक्यतारा साखर कारखाना सातारा या सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांना नोटिसी बजावण्यात आल्या आहेत.
यावर्षीच्या एफआरपीप्रमाणे उसाचा दर द्यावाच लागेल, यासाठी राजयाचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही ठोस पावले उचलली आहेत. येत्या सात दिवसांत कोणते कारखाने एफआरपीप्रमाणे दर जाहीर करणार, याकडे लक्ष वेधले आहे. (वार्ताहर)

केंद्राचाच नियम
एफआरपीप्रमाणे दर ऊस घातल्यानंतर चौदा दिवसांनी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, हा केंद्र सरकारचा नियम आहे. मात्र बहुतांश सहकारी साखर कारखान्यांनी तो नियम पाळलेला दिसत नाही.

राज्यातील १६० साखर कारखान्यांनी शासनाने जाहीर केलेला किमान दर न दिल्याने या कारखान्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून मंगळवार, दि. २० रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.
सचिन रावळ, प्रादेशिक सह संचालक, साखर संकुल, पुणे