शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Navratri 2020 : मी- दुर्गा : अर्चना अहिरेकर यांनी गावापासून कोरोनाला दूर ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 5:51 PM

coronavirus, navratri, health, sataranews कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणे कधी-कधी अवघड ठरते; पण याच संकट काळात फलटण तालुक्यातील उळुंब येथील अंगणवाडी सेविका अर्चना अहिरेकर यांनी आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव अजूनही कोरोनापासून दूर ठेवले आहे. यामध्ये अहिरेकर यांचे योगदान मोलाचे आहे.

ठळक मुद्देNavratri 2020 : मी- दुर्गा : अर्चना अहिरेकर अहिरेकर यांनी गावापासून कोरोनाला दूर ठेवले

नितीन काळेलकोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणे कधी-कधी अवघड ठरते; पण याच संकट काळात फलटण तालुक्यातील उळुंब येथील अंगणवाडी सेविका अर्चना अहिरेकर यांनी आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव अजूनही कोरोनापासून दूर ठेवले आहे. यामध्ये अहिरेकर यांचे योगदान मोलाचे आहे.जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे. यामध्ये आरोग्य विभागाबरोबरच अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान ठरत आहे. याला कारण म्हणजे सेविकांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण याबाबतीत उळुंब येथील अंगणवाडी सेविका व महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या जिल्हाध्यक्षा अर्चना अहिरेकर सुदैवी ठरल्या. कारण, त्यांना ग्रामस्थांचे सहकार्य नेहमीच मिळत आले आहे. तसेच कुटुंबही पाठीशी राहिले.फलटण तालुक्यातील उळुंबची लोकसंख्या १०५२ आहे. या गावात अजूनही कोरोनाने शिरकाव केलेला नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तर गावात मुंबईतून ९५ लोक आले होते. या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे त्यांनीही नियमांचे पालन केले.

विशेष म्हणजे अर्चना अहिरेकर यांनी होम क्वारंटाईन झालेल्या काही लोकांना बाजार, भाजीपाला आणि दूध घरी पोहोच केले. अडचणी जाणून घेतल्या; पण गावात कोरोना विषाणू येऊ द्यायचा नाही, यासाठी त्या कार्यरत राहिल्या.आजही त्या घरोघरी भेट देऊन माहिती घेत असतात.

कोणाला सर्दी, ताप, खोकला आहे का? याची नोंद घेऊन संबंधितांना माहिती दिली जाते. याच कोरोना काळात गावात आरोग्य शिबिर झाले. त्यामधून काही लोकांना मधुमेह, रक्तदाब दिसून आला. सॅनिटायझरचा वापर, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर याबाबत लोकांमध्ये जनाजागृती करण्यात अर्चना अहिरकेर यशस्वी ठरल्यात. ग्रामस्थांचेही सहकार्य मिळत आहे. त्यामुळे उळुंब अजूनही कोरोना विषाणूपासून दूर आहे.

गावातील लोक सुशिक्षित आहेत. आवश्यक तेवढ्या कामासाठीच ग्रामस्थ गावाबाहेर पडत आहेत. तर बाहेरच्या गावांतील लोकांना प्रवेश बंद केला होता. त्यामुळे उळुंब गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. यापुढेही गावात कोरोना येऊ द्यायचा नाही. ग्रामस्थांचा हा निर्धार अजूनही कायम आहे.- अर्चना अहिरेकर,अंगणवाडी सेविका(८८३०२११५७७)

टॅग्स :Navratriनवरात्रीcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यSatara areaसातारा परिसर