शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांची बावधनला तातडीने भेट

By admin | Updated: December 2, 2014 00:18 IST

‘लोकमत’चे कौतुक : काविळ झालेल्या रुग्णांची चौकशी

बावधन : बावधन, ता. वाई येथे काविळीच्या आजाराची तीनशे जणांना लागण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी तातडीने गावास भेट दिली. बावधनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची त्यांनी भेट घेऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना काळजी घेण्याबाबत सूचना केली.
बावधन गावची लोकसंख्या सुमारे १५ हजार आहे. या गावाला नागेवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील जलशुद्धीकरण करणारा प्रकल्प बंद असल्यामुळे लोकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे लोक काविळीने आजारी पडत आहेत.
याबाबत ‘लोकमत’मध्ये ग्रामस्थ काविळीने आजारी पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी बावधनला भेट दिली. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी दीपा बापट, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर.बी. साठे यांना तत्काळ दोन हजार लिटरचे पाणी शुद्धीकरण व टीसीएल पावडरचे मिश्रण करणारी सिमेंटची टाकी बांधावी. यामधून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला ती जोडून त्याद्वारे संपूर्ण गावास पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.
२००७-०८ पासून नागेवाडी धरणातून गावाच्या मुख्य टाकीत सायफन पद्धतीने पाणी टाकले जात आहे. पण, टाक्यांची स्वच्छता व टीसीएल पावडरचा वापरच होत नव्हता. त्यामुळे काविळीचा आजार झाला, असल्याचे सांगण्यात येत आहे. बावधनमधील रुग्णांवरती शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयातही उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा तत्परतेने कामाला लागली. यामुळे ‘लोकमत’चे सर्वत्र कौतुक होत
आहे. (वार्ताहर)

कवठे येथेही काविळीचे वीसहून अधिक रुग्ण
कवठे : बावधनपाठोपाठ वाई तालुक्यातील कवठे येथेही काविळीचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. सध्या वीसपेक्षा जास्त रुग्ण काविळीच्या आजाराशी सामना करीत आहेत. हे सर्वच्या सर्व रुग्ण वाई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दररोज शेतमाल घेऊन जाणारे तरुण शेतकरी आहेत. दररोज शेतामधून माळवे काढायचे व दुचाकीवरून किंवा तरकारी वाहतूक करणा-या वाहनातून वाई बाजार समितीत पोहोचायचे. तेथे पाणी प्यायचे, चहा-नाष्टा करायचा आणि पुन्हा आपापल्या गावी माघारी यायचं. हा वाई तालुक्यातील विविध गावांच्या शेतकरी वर्गाचा नित्यक्रम. अशामुळेच सुमारे वीस जणांना कावीळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.


दीड महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी विश्वासाने सरपंचपदाची माळ माझ्या गळ्यात घातली. बाधवन गावाच्या विकासासाठीच माझी कारकिर्द असेल. गावात काविळचे रुग्ण आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मी व माझे सहकारी सदस्य प्रयत्न करीत आहोत. आम्ही नक्कीच या संकटावर मात करण्यात यशस्वी होऊ.
- नारायण पिसाळ, सरपंच