शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजाराबाबत शासनाने निर्णय घेण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आठवडी बाजार बंद केले. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आठवडी बाजार बंद केले. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल किंमत आली आहे. कोरोना काळात व्यापारी मालामाल झाले आहेत. बाजारतळ व मंडई बंद असल्याने व्यापारी व शेतकरी मिळेल त्या ठिकाणी मालाची विक्री करत आहेत. त्यामुळे शासनाने आठवडी बाजाराबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.

गतवर्षी कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वत्र लाॅकडाऊन घोषित केला होता. यावेळी सर्व व्यवहार बंद ठेवले होते. त्यावेळी अंशतः अत्यावश्यक व्यवहाराला थोडीफार सूट देण्यात आली होती. शेतकऱ्यांना ही शेतीमाल फिरून विक्री करण्यास परवानगी दिली होती.

त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरू केले. मात्र, त्या काळातील आठवडी बाजाराची बंदी कायम ठेवली होती. आठवडी बाजार सुरू होतील, अशी आशा शेतकऱ्यांचे व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकालाही होती. मात्र त्यातच कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा सर्वत्र लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. हळूहळू सुरू झालेले व्यवहार पुन्हा बंद झाले. त्यामुळे आठवड्याची बाजार सुरू होण्याची आशा मावळली.

गेल्या महिन्यापासून शासनाने टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरू केले आहेत तसेच शाळा-महाविद्यालयही ४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे तर मंदिरे ही घटस्थापनेच्या दिवशी सुरू होत आहेत. तर सिनेमागृह व नाट्य मंदिरेही पुढील महिन्यात सुरू होत असल्याने शासनाने आठवडी बाजाराविषयी सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

आठवडी बाजार बंद असल्याने तसेच सध्या शेतीमध्ये सुगीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू व्यापारीवर्ग कवडीमोल भावाने विकत घेत आहेत तसेच बाजार व बाजारस्थळांवर विक्रेत्यांना बंदी असल्याने व्यापारी ही मिळेल त्या ठिकाणी शेतीमालाची विक्री करत आहे. त्यामुळे शासनाने लवकर हे आठवडी बाजार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

(चौकट)

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले...

सुगीचे दिवस असल्याने शेतकरी वर्गाला बाजारपेठेत मालाची विक्री करण्यास वेळ नाही. शेतामध्ये आलेला शेतमाल मिळेल, त्या दराने विकून पुन्हा शेतात जात आहेत. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन व्यापारी कवडीमोल भावाने विकत घेत आहेत व दिवसभर चढ्या भावाने विकत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

फोटो... २६ मायणी

आठवडी बाजार बंद असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याकडेला चौकामध्ये मिळेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने शेतीमाल विकला जात आहे.

(छाया : संदीप कुंभार)