शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:28 IST

खटाव : ऐन सुगीच्या तोंडावर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याला आता आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. हातातोंडाशी आलेली ...

खटाव : ऐन सुगीच्या तोंडावर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याला आता आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. हातातोंडाशी आलेली पिके अनेक ठिकाणी भुईसपाट झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे. एकीकडे आगाप कांद्याची काढण्याची घाई, तर दुसरीकडे गहू, हरभरा, ज्वारी, आदी पिके काढण्याची वेळ आली असतानाच पावसाची हजेरी लावल्याने हातात आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या आगाप कांद्याच्या काढणीची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे उन्हाळी हंगामाचा कांदा पीक सर्वत्र जोमात असतानाच पाऊस व त्याचबरोबर पडलेल्या गारामुळे अत्यंत नाजूक असलेल्या या पिकावर असता मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येते आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवत आहे. कांद्याबरोबरच मागास असलेल्या गहू, हरभरा पिकांवर या बदललेल्या वातावरणाचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. आगाप कांद्याला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी त्याच्या काढणीच्या व काटणी करून मार्केटमध्ये पाठविण्याच्या गडबडीत आहेत. या बदललेल्या वातावरणाची त्याला देखील धास्ती बसली आहे. आता कुठे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळत असल्यामुळे त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह शेतात पळापळ करताना दिसत आहे. कांदा लागवडीनंतर मागीलवर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम उत्पादनावर झाला असल्यामुळे पहिल्यांदाच शेतकऱ्याला त्याच्या मालाला दर चढा मिळत आहे, तर दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यात सामान्य नागरिकांना कांदा चढ्या दराने खरेदी करावा लागत आहे. घाऊक बाजारात प्रति किलो कांदा ४० ते ५० रुपये दराने विकला जात आहे. नवीन उत्पादन बाजारात येईपर्यंत अस्मानी संकटाने जर असेच आक्रमण ठेवले तर मात्र कांदा उत्पादनात घट होणार आहे.

कोट..

स्वयंपाक घरात अत्यावश्यक असलेला कांद्याच्या वाढत्या दरामुळे गृहिणी व सर्वसामान्य लोकांचे बजेट मात्र चांगलेच कोलमडले आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी व निसर्गाच्या या बदलत्या रुपामुळे उत्पादनात घट येत आहे. आवक कमी झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने जोपर्यंत कांदा मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहतील.

- तानाजी यादव, कांदा व्यापारी

२१खटाव

कॅप्शन : कांद्याला असलेला वाढता दर, तसेच अवकाळीच्या भीतीने आगाप काढून ठेवलेल्या कडा भरणीच्या लगबगीत शेतकरी.