शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: पूरस्थितीमुळे सातारा-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 20:18 IST

मध्य रेल्वेकडून हिरवा कंदील : १३ ऑगस्टपर्यंत दररोज फेऱ्या.

अविनाश कोळी/सांगली, लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : नागरिक जागृती मंचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. बुधवारी ७ ऑगस्टपासून १३ ऑगस्टपर्यंत सातारा-सांगली-कोल्हापूर विशेष रेल्वे गाडी दररोज धावणार आहे.

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे २० जुलैपासून कृष्णा, वारणा, कोयना, पंचगंगा, येरळा नद्या भरून वाहत आहेत. तिन्ही जिल्ह्यातील अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली आहेत. सध्या पूर ओसरत असला तरी वाहतूक सुरळीत होण्यास काही दिवस लागणार आहेत. पुराच्या काळात सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांतील एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या. अजूनही काही मार्गावर फेऱ्या बंद आहेत.

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात अशीच पुरस्थिती झाल्यानंतर दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने चार संपर्क क्रांती व ईतर १० रेल्वे गाड्यांना उगारखुर्द व कुडची स्थानकांवर थांबा दिला होता. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी संपर्क क्रांती गाड्या सांगली, भिलवडी, कराड व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबवाव्या तसेच किर्लोस्करवाडी व भिलवडी येथे आणखी दहा गाड्यांना थांबा देण्याची विनंती सांगली जिल्हा नागरीक जागृती मंचने केली होती. पण मध्य रेल्वेने काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मंचने पंतप्रधानांकडे ऑनलाईन तक्रार केली. त्यावर रेल्वे विभागाने सातारा-सांगली-कोल्हापूर पूर विषेश रेल्वे गाडी सुरू केल्याचे सांगितले.

अशी धावणार सातारा-कोल्हापूर गाडी (क्र. ०१४१२)

सातारा दुपारी २:२०, कोरेगाव २.३३, रहीमतपूर २.४३, तारगाव २.५३, मसूर ३.०५, शिरवडे ३.१५, कराड ३.२५, शेणोली ३.३८, भवानीनगर ३.४५, ताकारी ३.५०, किर्लोस्करवाडी ४, भिलवडी ४.१५, नांद्रे ४.२३, सांगली ४.३८, विश्रामबाग ४.४३, मिरज सायं. ५.२०, जयसिंगपूर ५.३५, हातकणंगले ५.५०, रुकडी ६, वळिवडे ६.०६, कोल्हापूर सायंकाळी ६.३५चौकट

अशी धावणार कोल्हापूर-सातारा गाडी (क्र. ०१४११)कोल्हापूर सकाळी ८.४०, वळीवडे, ८.४८, रुकडी ८.५५, हातकणंगले ९.०५, जयसिंगपूर ९.२०, मिरज सकाळी ९.४५, विश्रामबाग ९.५३, सांगली १०, नांद्रे १०.१५, भिलवडी १०.२५, किर्लोस्करवाडी १०.४०, ताकारी १०.५०, भवानीनगर १०.५५, शेणोली ११.०५, कराड ११.२५, शिरवडे ११.३५, मसूर ११.५०, तारगाव दुपारी १२, रहीमतपूर, १२.१०, कोरेगाव १२.२५, सातारा १,३५

सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी या विशेष रेल्वे गाडीचा लाभ घ्यावा तसेच सांगली रेल्वे स्टेशनवर या गाडीची येण्याची वेळ सोयीस्कर असल्याने सांगली स्टेशन जवळील मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या लोकांना मोठा लाभ होणार आहे. सर्व थांबे दिल्याने विश्रामबागपर्यंत येणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचीही सोय होणार आहे

- सतीश साखळकर, अध्यक्ष नागरिक जागृती मंच

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूरrailwayरेल्वे