शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरचा विकास म्हणजे लांडगा आला रे आला!

By admin | Updated: October 18, 2015 23:30 IST

विजय कुंभार : पालिकेतील सत्ताधाऱ्यांची पोकळ घोषणा, शहरवासीयांची केली फसवणूक

अशोक पाटील -- इस्लामपूर--माजी ग्रामविकास मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूरची बारामती करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी राज्य व केंद्राकडून निधीही उपलब्ध करून दिला आहे. परंतु या पैशातून इस्लामपूरची बारामती तर झालीच नाही. उलट सत्ताधाऱ्यांनी खोट्या घोषणा करून ‘लांडगा आला रे आला’ याप्रमाणे शहरवासीयांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.कुंभार म्हणाले, नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीवेळी सत्ताधारी राष्ट्रवादीला दिव्य स्वप्ने पडू लागतात. आघाडी शासनाच्या काळात जयंत पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाकडून शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या रकमेतून झालेला विकास शहरवासीयांच्या नजरेपलीकडे गेलेला आहे. जो विकास झाला आहे, त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे, तर काही विकासाच्या योजना अर्धवट आहेत. काही कागदावरच वर्षानुवर्षे आहेत. कोट तलाव सुशोभिकरण, व्हेजिटेबल मार्केट, डिजिटल लायब्ररी, ट्रॅफिक सिग्नल, २४ तास पाणी, अद्ययावत रस्ते, आयुर्वेदिक बगीचे या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोषणेपैकी एकही काम झाले नाही. त्यामुळे त्यांच्या घोषणा या ‘लांडगा आला रे आला’ या वाक्यप्रचाराला तंतोतंत जुळणाऱ्या आहेत.गेल्या चार वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी केंद्र शासनाकडून भुयारी गटार योजनेसाठी ७० कोटी अनुदान मंजूर झाल्याची घोषणा केली होती. परंतु ही योजना बंद की चालू यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला होता. ही योजना रद्द झाल्याची घोषणा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी केली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची ही घोषणाही पोकळच ठरली होती. योजना हवेत विरणार असल्याचे दिसताच सत्ताधारी राष्ट्रवादीने जयंतरावांकडे धाव घेऊन योजनेचा प्रस्ताव दिला. त्यासाठी रस्ते अनुदानाचे २३ कोटी रुपये बेकायदेशीरपणे वर्ग करून रस्ते प्रकल्प गुंडाळला. त्या २३ कोटींचे व्याज जवळजवळ कोटींच्या घरात गेले आहे. त्याचा हिशेबही सत्ताधाऱ्यांकडे नाही. याउलट भुयारी गटारीचा प्रकल्प तयार करण्यासाठी पुण्यातील एका कंपनीच्या नावे ५० लाख खर्ची टाकले. रस्ते विकास प्रकल्प तयार करण्यासाठी ५० लाख खर्च करून तोही प्रकल्प गुंडाळला आहे. हा खर्च शहरवासीयांच्या माथी कर रूपाने मारला जाणार असल्याचेही कुंभार म्हणाले.तरच विश्वास बसेल..!कुंभार म्हणाले, सध्या राज्यात, केंद्रात राष्ट्रवादीची सत्ता नाही. भुयारी गटारीसाठी राज्य शासनाकडून मिळणारे ७० कोटी रुपये हे फक्त मंजूर झाल्याच्या वल्गना होत आहेत. जेव्हा त्याचे अनुदान इस्लामपूर पालिकेच्या तिजोरीत पडेल तेव्हाच त्याच्यावर शहरवासीयांचा विश्वास बसेल.