शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने देशाला कर्जाच्या खाईत ढकलले, जयंत पाटीलांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 15:30 IST

'शेतकऱ्यांना कर्जमाफी, उद्योग, रोजगार हे काहीही न करता मूठभर श्रीमंतांची २५ लाख कोटींची कर्जे माफ करण्याचे काम त्यांनी केले'

बोरगाव : मोदी सत्तेवर येण्यापूर्वी देशावर ५६ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. १० वर्षांत ते २१० लाख कोटी रुपयांवर गेले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, उद्योग, रोजगार हे काहीही न करता मूठभर श्रीमंतांची २५ लाख कोटींची कर्जे माफ करण्याचे काम त्यांनी केले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.बोरगाव (ता. वाळवा) येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी सत्यजित पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, प्रतीक पाटील आदी उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, भाजप पुन्हा सत्तेत आल्यास देशावरील कर्जे कमी करण्यासाठी जीएसटीसारखे कर वाढविण्याचा धोका आहे. एक लाखाची खते घेतली, तर त्यातून १८ हजार रुपये जीएसटी भरावा लागतो. त्यातूनच शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. ही पाकीटमारी आहे.सत्यजित पाटील म्हणाले, भाजपने गेल्या १० वर्षांत अशी कोणती कामे केली, की ज्याच्या जोरावर ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून देण्याची भाषा भाजप करीत आहेत. पुन्हा सत्तेवर येण्याची खात्री नसल्यानेच सत्तेचा गैरवापर करून दुसऱ्यांचे पक्ष फोडत आहेत.उपसरपंच सचिन पाटील, तानाजी पाटील, शकील सय्यद, योजना पाटील, अभिजित पाटील, कार्तिक पाटील, धैर्यशील पाटील, उदय शिंदे, शिवाजी वाटेगावकर, संजय पाटील, देवराज देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Jayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाSatyajit Patilसत्यजित पाटील