शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, उष्णतेचा ‘पारा’ वाढत आहे...

By admin | Updated: May 28, 2015 00:42 IST

तापमानाची तपासणी : अभियांत्रिकी विद्यार्थी करत आहेत सेन्सर पद्धतीने अभ्यास

नरेंद्र रानडे -सांगली -मागील चार वर्षाच्या मे महिन्यातील तापमानाचा आढावा घेतल्यास, सांगली जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस कमी-अधिक प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी दुपारच्यावेळी नागरिकांचा रस्त्यावरील वावर कमी झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या महिन्यात सांगलीचे सर्वाधिक कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले आहे. तापमान मोजणाऱ्या उपकरणांचा अभ्यास करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य शाखेतील सुमारे एक हजारहून अधिक विद्यार्थी हवामान खात्याच्या कार्यालयास भेट देत आहेत. वारणाली परिसरातील पाटबंधारे कार्यालय आवारात जलविज्ञान प्रकल्पाचा उपविभाग असून, त्याअंतर्गत असणाऱ्या हवामान खात्यात दररोजच्या तापमानाची नोंद घेतली जाते. सांगली जिल्ह्यात सांगलीव्यतिरिक्त म्हैसाळ (ता. मिरज), शिगाव (ता. वाळवा) आणि अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे हवामान केंद्रे आहेत. त्याचप्रमाणे कवठेएकंद (ता. मिरज), रुकडी आणि पेठ-इस्लामपूर येथे तापमानाची नोंद करण्यासाठी सेन्सर पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. तापमानाची प्रामुख्याने दोन पध्दतीने तपासणी करण्यात येते. यामध्ये सनशाईन रेकॉर्डर पध्दत महत्त्वाची आहे. थर्मामीटरसारख्या उपकरणाच्या साहाय्याने कमाल आणि किमान तापमान मोजण्यात येते. कमाल तापमान मोजण्यास पारा, तर किमान तापमान मोजण्यास अल्कोहोलचा वापर करण्यात येतो. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या कालावधीतील कमाल (जास्तीत जास्त) आणि किमान (कमीत कमी) तापमानाची नोंद हवामान खात्यात दररोज करण्यात येत आहे. हवामान केंद्राच्या आवारात बाष्पीभवनपात्र असून त्याद्वारे उष्णतेमुळे किती पाण्याची वाफ झाली, याची नोंद करण्यात येत आहे. यंदा उन्हाळ्यात सरासरी चार ते साडेचार मिलिमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. यावरूनच विविध कालवे व धरणांतील बाष्पीभवन किती प्रमाणात होते, याचा अंदाज येतो. मागील वर्षापेक्षा यंदा मात्र उष्णतेची तीव्रता अधिक असून, अजून काही दिवस तरी नागरिकांना उष्णतेचा त्रास होणार आहे. उन्हाळ्यात पाऊस पडला तर हवामानात बदल होतो. परिणामी तापमानाची तीव्रता कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात जोरात वारे वाहत असतील तरी देखील तापमान कमी होते. - एम. जी. मळवाडे, सहायक अभियंता श्रेणी २ सांगली.पर्यावरणाचा समतोल ढासळत असल्याने मागील चार वर्षाचा आढावा घेतल्यास, यंदा मे महिन्याच्या प्रारंभीच तापमानात वाढ झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात ४०.५ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले होते. - एस. आर. पाटणे, उपविभागीय अभियंता, जलविज्ञान प्रकल्प गेल्या तीन वर्षातील तापमानदिनांक व वर्षकमाल तापमान दिनांक व वर्षकमाल तापमानदिनांक व वर्ष कमाल तापमान २ मे २०१३३९२ मे २०१४३७,५२ मे २०१५३९४ मे २०१३३७.५४ मे २०१४३७४ मे २०१५३९११ मे २०१३३९.५११ मे २०१४३५११ मे २०१५३९२४ मे २०१३३६२४ मे २०१४३९.५२४ मे २०१५३६