शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातच ऑक्सिजन निर्मिती प्लांटसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST

सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येचा वेग पाहिला तर येत्या चार-पाच दिवसात जिल्ह्यातील सर्व बेड संपतील, अशी स्थिती आहे. प्रशासनाने आता ...

सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येचा वेग पाहिला तर येत्या चार-पाच दिवसात जिल्ह्यातील सर्व बेड संपतील, अशी स्थिती आहे. प्रशासनाने आता तालुका पातळीवरही उपचारांची सोय केल्याने रूग्णसंख्या वाढली तरी उपचारासाठी यंत्रणा सज्ज आहे. ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी जिल्ह्यातच निर्मिती प्लांट सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार अरूण लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने सध्या दहा हजारांवर रुग्ण उपचार घेत आहेत. यात दररोज हजार रूग्णांची भर पडत असल्याने यंत्रणेवरील ताण वाढत आहे. रूग्णवाढीचा वेग बघता, येत्या चार-पाच दिवसात जिल्ह्यातील सर्व बेड्स फुल्ल होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने तालुका पातळीवर उपचारांची सोय केली आहे. कोणत्याही परिस्थितीत रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी यंत्रणा सज्ज असली तरी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यासाठीच आता प्रशासनाने जिल्ह्यातच ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याबाबत कार्यवाही सुरू करावी. महापालिका, जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणांनी उपचाराची सोय करण्यावर भर द्यावा.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, संक्रमण रोखण्यासाठी ग्रामीण भागातील जबाबदार घटकांना सोबत घेऊन प्रशासनाने काम करावे. गृह अलगीकरणातील व्यक्ती बाहेर पडणार नाहीत, यासाठीही अजून कठोर नियमावली करावी, जेणेकरून संसर्ग वाढणार नाही. लसीकरणाचे नियोजन केल्यास कोणतीही अडचण येणार नाही.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आदी उपस्थित होते.

चौकट

रेमडेसिविरचा पुरवठा केंद्राच्या हातात

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना रूग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविरची मागणी वाढत असली तरी आता त्याचा पुरवठा केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या इंजेक्शनमधील काही वाटा जिल्ह्याला मिळणार आहे. तरीही अधिक कुप्या मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहे.