शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात २२ तलाव कोरडे

By admin | Updated: May 26, 2015 00:54 IST

मेणी खोऱ्यात टंचाई : १८ तलावात ३० टक्क्यांपेक्षा कमी पाणी

शिराळा : शिराळा तालुक्यातील ४९ पाझर तलावांपैकी २२ तलाव कोरडे पडले आहेत, तर १८ तलावात ३० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. शिंदेवाडी येथील तलावातील पाणीसाठा नोव्हेंबरमध्येच पूर्ण कोरडा पडला आहे. सध्या या गावास टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याचबरोबर आटुगडेवाडी, धुरंदेवाडी, धसवाडी, कुसळेवाडी यासह मेणी खोऱ्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यात ४९ पाझर तलाव असून, यापैकी निगडी (जुना), बेलदारवाडी, कोंडाईवाडी क्र. २, हत्तेगाव (अंबाबाईवाडी), शिरसटवाडी, चरणवाडी नं. १, औंढी, शिरशी जुना, शिरशी (भैरवदरा), शिवरवाडी, पावलेवाडी नं. १, शिरशी (काळखिंड), भैरेवाडी, तडवळे नं. १, पावलेवाडी नं. २, भटवाडी, प. त शिराळा नं. २, करमाळे नं. २, निगडी (खोकडदरा), लादेवाडी, इंग्रुळ, सावंतवाडी हे २२ तलाव कोरडे पडले आहेत, तर पाडळी (३० टक्के), प. त. शिराळा नं. १ (१० टक्के), करमाळा नं. १ (४० टक्के), खेड (३० टक्के), पाडळीवाडी (२५ टक्के), वाकुर्डे खुर्द (३५ टक्के), अंत्री खुर्द (५० टक्के), निगडी (महादरा २५ टक्के), आटुगडेवाडी-मेणी (३० टक्के), वाडीभागाई (६० टक्के), तडवळे (वाडदरा २० टक्के), हत्तेगाव (८० टक्के), गवळेवाडी उंदीर खोरा (३० टक्के), गवळेवाडी बहीरखोरा (४० टक्के), धामवडे कुंडनाला (३० टक्के), मेणी साक्रुंपीनाला (२० टक्के), बादेवाडी वाकुर्डे खुर्द (२० टक्के), शिरशी कासारकी (१० टक्के) कोंडाईवाडी नं. १ (३० टक्के), चव्हाणवाडी (३० टक्के), वाकुर्डे बुद्रुक जामदाड (२० टक्के), कापरी (२० टक्के), बिऊर (३० टक्के), खिरवडे (४० टक्के), पाचुंब्री (३० टक्के), भाटशिरगाव (२५ टक्के), रेड क्र. २ (४५ टक्के) असा पाणीसाठा शिल्लक आहे. चांदोली धरण हे अनेक जिल्ह्यांची वरदायिनी ठरलेले धरण आहे. तालुक्यात मात्र याच धरणाजवळील मेणी खोऱ्यातील अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. (वार्ताहर)टँकरमुक्त तालुक्यात टँकरशिंदेवाडी येथे पाझर तलावाचे काम निकृष्ट झाले आहे. खराब बांधकामामुळे गेली १२ वर्षे येथील तलाव नोव्हेंबरमध्ये कोरडाच पडतो. याबाबत पाटबंधारे विभागाला कोणतेही गांभीर्य नाही. तलावात योग्य प्रमाणात पाणीसाठाच होत नाही. गळती काढण्यासाठीही कोणत्याही हालचाली नाहीत. आजवर टॅँकरमुक्त अशी ओळख असलेल्या शिराळा तालुक्यातील या गावास टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. धुरंदेवाडी, आटुगडेवाडी, धसवाडी, कुसळेवाडीसह अनेक वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत आहे.