शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अनावश्यक घराबाहेर पडल्यास जप्त हाेणार वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

रत्नागिरी : काेराेनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही ...

रत्नागिरी : काेराेनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही अनेकजण गाडी घेऊन अनावश्यक फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या लाेकांवर वाहतूक पाेलीस विभागाने कडक पावले उचलून वाहनेच जप्त करण्याची माेहीम हाती घेतली आहे. रत्नागिरी शहरात तब्बल २५ वाहने जप्त करून पाेलीस मुख्यालयातील मैदानावर आणून ठेवण्यात आली आहेत.

गेले काही दिवस सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या कालावधीत कोरोना अनुषंगाने कोणतेही नियम न पाळता भाजीपाला व अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रत्नागिरी व चिपळूण येथील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत होती. रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथील बाजारपेठेत सकाळी ११ वाजल्यानंतर मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानंतरही लोकांची व वाहनांची गर्दी होत आहे. अत्यावश्यक कारणांसाठीच बाहेर पडण्याची मुभा असतानाही अगदी क्षुल्लक कारणासाठी लोक वाहनासह मोठ्या प्रमाणावर बाहेर येत येत आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरी व चिपळूण येथील बाजारपेठेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा वाहतूक शाखा व पोलीस स्थानकाला दिले आहेत. तसेच आवश्यक कारणांसाठी बाहेर पडलेल्या लोकांकडूनही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांच्यावरही कारवाईचे आदेश दिले आहेत.

या अनुषंगाने ९ मे २०२१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात मोटार वाहन कायद्यान्वये एकूण ८८६ वाहनांवर, तर विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या ३८५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी शहरात अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरणाऱ्या वाहन चालकांकडील एकूण २५ वाहने जिल्हा वाहतूक शाखेकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. ती लाॅकडाऊन संपल्यानंतरच संबंधितांना परत केली जाणार आहेत.

--------------------------

कायद्यानुसार कारवाई - ८८६ वाहने - ३,१९,६०० रुपये दंड

विना हेल्मेट - ३८५ वाहने - १,९२,५०० रुपये दंड

--------------------------

काेराेनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांच्या आराेग्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहतूक शाखेची कारवाई सुरूच राहणार आहे. घरात राहा, सुरक्षित राहा.

- शिरीष सासणे, पाेलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रत्नागिरी