शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनबाबत गुरुवारी निर्णय : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही लाॅकडाऊन करायचे का, याबाबत पालकमंत्री ॲड. अनिल परब ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही लाॅकडाऊन करायचे का, याबाबत पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्याशी गुरुवारी सांगोपांग चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय हाेईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी ऑनलाइन घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा प्रशासनासोबत आयोजित ऑनलाइन बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात सामंत यांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्यातील २० पेक्षा अधिक जिल्हे लाॅकडाऊनमध्ये आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सोमवारपासून लाॅकडाऊन सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीतही वेळ पडल्यास लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल, याबाबत गुरुवारी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्यासोबत गुरुवारी होणाऱ्या बैठकीत सविस्तर चर्चा होईल आणि वेळ पडल्यास लाॅकडाऊन करावाच लागेल. मात्र, यासाठी गुरुवारी होणाऱ्या बैठकीत सर्व घटकांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. मात्र, वेळ पडल्यास लाॅकडाऊन करावे लागेल, याचा पुनरुच्चार सामंत यांनी केला.

सध्या कोविड परिस्थितीचा विचार करून गुरुवारी होणाऱ्या बैठकीत लाॅकडाऊनबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाॅकडाऊन होईलच असे नाही. मात्र, वेळ आली तर लाॅकडाऊन करावेच लागेल. आजही कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यामुळे वेळ पडल्यास लाॅकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज भासणार आहे. सर्व पक्षघटकांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री सामंत यांनी यावेळी केले.

राज्याच्या स्वतंत्र ॲपची मागणी

जिल्ह्यात सर्वांना लसीकरण तेही मोफत केले जाणार आहे. साेमवारी २८,७०० लसीचे डोस जिल्ह्याला उपलब्ध झाले आहेत. लसीचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कोविशिल्डचे २० हजार डोस मिळाले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी सध्या केंद्राचे ॲप नोंदणीसाठी वापरले जात असल्याने गाेंधळ होत आहे. त्यामुळे राज्याचे ॲप तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

उपकेंद्र स्तरावर लसीकरण

सध्या लसीकरणासाठीची गर्दी लक्षात घेऊन उपकेंद्र स्तरावरही लसीकरण करता येइल, अशी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही सामंत यांनी सांगितले.