शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

अशी ही रत्नागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

‘सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन’ नंदनवन म्हणजे स्वर्गातील इंद्राची बाग, आमचं कोकण त्यापेक्षा कोठे ...

‘सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन’

नंदनवन म्हणजे स्वर्गातील इंद्राची बाग, आमचं कोकण त्यापेक्षा कोठे कमी आहे, कोकण म्हणजे पृथ्वीवरच नंदनवनच.

कोकण प्रदेश म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली सौंदर्याची उधळण, स्वच्छ, सुंदर, निर्मनुष्य सागरकिनारे… तितकीच संपन्न बंदरे, मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले किल्ले, पुरातन लेणी, गरम पाण्याची कुंडे, धबधबे, लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेली गावागावातील मंदिरे, तिथल्या जत्रा, उत्सव, शेकडो जाती-प्रजातींचे पशु-पक्षी, बाराही महिने आपली वेगवेगळी रूपे दाखवणारा इथला वैविधतेने नटलेला निसर्ग हे तर कोकणचं खरं वैभव. पर्यटकांना जे हवं असत ते सगळं देणारा कोकण.

पण आमच्या या श्रीमंतीची आजवर जणू आम्हालाच जाणीव नव्हती. आमच्या वैभवाची ताकद जणू आम्हालाच माहीत नव्हती. म्हणजे आमची स्थिती त्या कस्तुरी मृगासारखी होती. आपल्याजवळच्या ठेव्याचं आपण जर योग्य मार्केटिंग करण्यात यशस्वी झालो तर कोकण येणाऱ्या काळात जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख बनवेल, यात तीळमात्र शंका नाही इतकी संपन्नता.

शहरी जीवनातील घड्याळाच्या काट्यावर धावून दमलेला माणूस गेल्या काही वर्षात कोकणातील निसर्गात आवर्जून येतोय. शरिरावरचा आणि मनावरचा ताण हलका करण्यासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकाला कोकणातला शांतपणा भावतो. प्रदूषणविरहित सागरात डुंबताना तो सारी टेंशन्स विसरून जातो, झावळ्यांनी शाकारलेल्या, शेणाने सारवलेल्या कोकणी घरात राहताना तो वेगळ्या दुनियेत हरवून जातो आणि कोकणात येणारा पर्यटक खास करून येतो तो इथल्या कोकणी स्वादाच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी. मग सकाळच्या न्याहारीतील आंबोळी आणि खोबऱ्याची चटणी असो की दुपारच्या जेवणातील ताजे फडफडीत मासे. चार दिवसांच्या कोकण वास्तव्यात तो सर्वार्थाने स्वर्गसुखाची अनुभूती घेऊनच आपल्या शहरात परततो.

इथे येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना आवडतं ते कोकणचं कोकणपण. गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली जे प्रकल्प इथे लादले जात आहेत आणि गेले आहेत, त्यातून पुढील काही वर्षात आपण कोकणचं हे कोकणपण तर गमवून बसणार नाही ना, अशी भीती मनात दाटून जाते. कोकणी माणसाचा विकासाला विरोध नाही पण हा विकास कोकणचं कोकणपण टिकवून असावा, इतकीच माफक अपेक्षा आहे.

गेल्या २० वर्षांत कोकणातील गावागावातील तरुण मंडळींनी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांतून अनेक गावांतून पर्यटन विकसित झालंय. अधिक व्यावसायिक पध्दतीने पर्यटकांना सुविधा आणि सेवा देत या तरुण मंडळींनी जगभरातून आलेल्या पर्यटकांची वाहवा मिळवली आहे. यामुळेच एकदा कोकणात येऊन गेलेला पर्यटक आता पुन्हा-पुन्हा कोकणात येऊ लागला आहे.

गेल्या काही काळात रत्नागिरी पर्यटनाचे नवं डेस्टिनेशन ठरत आहे. एकेकाळी गोवा पर्यटनाचे मुख्य केंद्र होते. हळूहळू पर्यटक गोव्यातील गर्दीला कंटाळून तळकोकणातील सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांना पसंती देऊ लागला. आता गेल्या काही वर्षांत हाच पर्यटक रत्नागिरीकडे वळतोय. रत्नागिरी ही पर्यटकांना जे हवंय ते देण्यासाठी सज्ज झालेय. रत्नागिरीत येणारा पर्यटक जसा इथल्या निसर्गाने इथे ओढून आणला जातो तसा तो खास इथल्या खाद्य संस्कृतीसाठी येतो. गावागावातील पर्यटन केंद्र या पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवत आहेतच. मालवणी फिश करी तर जगभर प्रसिद्ध झाली आहे.

पण गेल्या दीड वर्षाच्या कोरोनाच्या काळात कोकणातील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या काळात बंद राहिलेल्या व्यवसायाने इथल्या पर्यटन व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडले आहे. या काळानंतर इथले अनेक व्यवसाय बंद झाले तर अनेकजण पुन्हा जिद्दीने उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. येणारा वर्षभराचा कालावधी या व्यावसायिकांकरिता फार महत्त्वाचा कालावधी असणार आहे. खड्ड्यांनी भरलेले शहर आणि इथे पोहोचण्याच्या मुंबई - गोवा महामार्गाची अवस्था याची सोशल मीडियातून महाराष्ट्राभर झालेली प्रसिद्धी पर्यटन व्यवसायाकरिता नकारात्मक आहे. राजकीय मंडळींनी आता थोडी राजकीय इच्छाशक्ती दाखवत ही स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शहरात प्रवेश केल्यानंतर एका टुरिस्ट स्पॉटला पोहोचलो आहोत, याचा फिल पर्यटकांना येईल इतपत शहर सुशोभित करणं आणि पर्यटन स्थळांच्या इथे पर्यटकांना गरजेच्या असलेल्या प्राथमिक (बेसिक) सुविधा उपलब्ध होतील, यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.

आगामी काळात रत्नागिरी कोकणातील पर्यटनाच्या केंद्रस्थानी असणार आहे. स्थानिक तरुणांनी पर्यटनातून येणाऱ्या संधीत आपण कुठे असू, याचा विचार करून नियोजन केल्यास तो या विकास प्रक्रियेचा भाग बनणार आहे. प्रत्येक नजरेत निसर्गाचं एक वेगळं रूप दाखवणारी ही ‘देवभूमी’ येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

- सचिन देसाई, रत्नागिरी