शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सर सलामत तो....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

एवढं सगळं होऊनही अजूनही आपल्यापैकी काहींना शहाणपण येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. गेले सव्वा वर्षे आरोग्य यंत्रणेचा लढा ...

एवढं सगळं होऊनही अजूनही आपल्यापैकी काहींना शहाणपण येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. गेले सव्वा वर्षे आरोग्य यंत्रणेचा लढा अन्य यंत्रणांना सोबत घेऊन सुरू आहे. गेल्या वर्षीही मे महिन्यात कोरोना वाढू लागताच आपली भंबेरी उडाली होती. त्यातच भर पडली ती मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत जो कोरोनाचा हाहाकार सुरू झाला, त्याने अवघा जिल्हा हादरला; पण गेल्या वर्षाची कोरोनाच्या आकडेवारीचे रेकाॅर्ड केवळ एका एप्रिल महिन्याने तोडले. या महिन्यात अकरा हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले. हे पाहाता आपण लाॅकडाऊनला किती गांभीर्याने घेतले आणि घेत आहोत, याबाबतचे आत्मपरिक्षण अशा मंडळींनी जरूर करावे.

सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत दूध, भाजीपाला यांची दुकाने सुरू आहेत; मात्र लोक आता जणु काही दिवसभर तुरुंगातच रहाणार असून, उपाशी मरायला लागणार आहे, अशा बेताने अख्खे दुकान लुटून नेल्यासारखे नेत आहेत. ज्यांच्या किराणा मालाच्या दुकानात दुधाची विक्री होत आहे, अशांची चांदीच झाली आहे. अनेक दुकानदार अर्ध्यावर शटर सुरू ठेवून अन्य मालांचीही विक्री करत आहे. ज्यांच्या दुकानात दूध नाही, त्यांना घरपोच सेवेसाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचे दुकान मात्र कायमच बंद आहे. लाॅकडाऊनचा योग्य अर्थ नागरिकांना कळत नसल्याने आणि दुर्दैवाने त्याची जिथे आवश्यकता आहे तिथे योग्यरीत्या अंमलबजावणी होत नसल्यानेच सध्या लाॅकडाऊनचे तीन तेरा वाजले म्हणायची वेळ आली आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपल्या जीवाची काळजी घेण्याचा मक्ता शासन आणि त्याचे प्रशासन याची आहे. त्यामुळे आपण खड्ड्यात पडलो तरीही वाचवायला येणे, ही जबाबदारीही त्यांचीही आहे, हे आपल्या डोक्यात एकदम फिट्ट बसलेले असल्याने आपण प्रत्येक गोष्टीत बेफिकिरी दाखवत असतो. परिणामी, कधी तरी अशा बेफिकिरीचा जोरदार फटका असा बसतो की मग सारे होत्याचे नव्हते होऊन जाते. मृत्यू किती स्वस्त झालाय, हे कोरोनाने दाखवून दिले आहे. म्हणूनच आता तरी यातून थोडं शहाणं होऊया. या संकटातून सावरण्यासाठी केवळ आरोग्य यंत्रणा किंवा प्रशासन पुरेसे नाही, तर आपणही बराचसा हातभार लावण्याची गरज आहे. एक म्हण आहे - सर सलामत तो पगडी पचास. सध्या या म्हणीप्रमाणे प्रत्येकानेच आपली पगडी, अर्थात आपला आणि दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊया.