शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जोर काही दिवसात वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाची सुरुवात झाली आहे. रात्रीपासून जोर वाढला असून, शुक्रवारी सकाळीही तो कायम होता. त्यामुळे ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाची सुरुवात झाली आहे. रात्रीपासून जोर वाढला असून, शुक्रवारी सकाळीही तो कायम होता. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम रहाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवामान खात्याकडूनही १२ जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात पाठ फिरवलेल्या पावसाने जिल्ह्यात गुरुवारपासून पडण्यास सुरुवात केली आहे. सुमारे पंधरा दिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बळीराजा चिंतेत होता. परंतु गुरुवारपासून पुन्हा पावसाचे ‘कम बॅक’ झाले आहे. अधूनमधून जोरदार सरी काेसळत असल्याने आता गारवाही जाणवू लागला आहे.

गुरुवारी सकाळपासूनच पावसाने चांगली गती घेतली आहे. दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची जोरदार सुरुवात झाली. त्यानंतर ११ वाजल्यापासून थोडी उसंत घेतली होती. दुपारनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळीही पुन्हा वाढ झाली. दिवसभर पावसाचे वातावरण होते.

दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४३७.७० मिलिमीटर (सरासरी ४८.६३ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे. मात्र, कुठेही पडझडीच्या घटनांची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झालेली नाही.

भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार ९ ते १२ जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.