शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

गिरणी कामगार न्यायासाठी शेवटपर्यंत लढा देऊ : प्रवीण घाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

दापोली : गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रलंबित मागणीसाठी झालेल्या बैठकीत कामगारांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़़ गिरणी कामगारांना ...

दापोली : गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रलंबित मागणीसाठी झालेल्या बैठकीत कामगारांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़़ गिरणी कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याची प्रतिक्रिया गिरणी कामगार नेते प्रवीण घाग यांनी दिली आहे.

गिरणी कामगारांच्या प्रलंबित घरांच्या प्रश्नांवर ‘म्हाडा’मध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी म्हाडा मुख्य अधिकारी म्हसे, सह. मुख्य अधिकारी गोलांडे, मुख्य अभियंता व एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

एमएमआरडीएच्या २४१७ घरांचा ताबा देण्यासंबंधी चर्चा झाली तेव्हा म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हसे यांनी सांगितले की, एमएमआरडीएच्या घरासंबंधी देखभाल खर्च काेणी करायचा यासंबंधी निर्णय झाला नाही. येत्या १७ मे राेजी म्हाडा व एमएमआरडीए यांची बैठक या विषयावर राज्याचे मुख्य सचिव यांच्याजवळ घेण्यात येणार आहे. त्यावेळी हा विषय निकालात काढून पैसे भरलेल्या ६०० कामगारांना घरांचा ताबा देण्यात येईल तसेच उर्वरित कामगारांना पत्र ही वितरित केली जातील तसेच एमएमआरडीएची तयार २५७८ घरांची सोडत ही लवकरात लवकर काढण्यात येईल, असे स्पष्ट केले़

तसेच बॉम्बे डाईंग व श्रीनिवास घरांची काढलेल्या ३५०० घरांच्या सोडतीत यशस्वी झालेल्या कामगरांना प्रथम सूचनापत्र, मुंबई बँकेजवळ ॲग्रीमेंट प्रक्रिया पूर्ण होताच येत्या १० ते १५ दिवसांत कामगारांना वितरित केले जातील. पूर्वी हे पत्र बॅंकेत जमा करण्याची मुदत ४५ दिवसांची होती़ ती कोविडच्या कारणामुळे ३ महिन्यांची करण्यात येईल, असे सांगण्यात आले़

ज्या ६ गिरण्यांची सोडत सन २०१६ साली काढण्यात आली होती़ त्या घरांचा ताबा देण्याबाबत विचारण्यात आले़ त्यावेळी आजपर्यंत २२६१ कामगारांना ताबा देण्यात आला आहे उर्वरित प्रकरणे २ महिन्यांत पूर्ण केली जातील, अशी माहिती देण्यात आली़ सर्व कामगारांना म्हणजे आज केलेल्या १ लाख ७५ हजार कामगारांना घरे मिळावीत म्हणून कामगार संघटनेच्या नेत्यांनी पसंत केलेल्या जमिनीपैकी ४५ एकर जमिनीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहे, असे म्हसे यांनी सांगितले. यावेळी गिरणी कामगार कृती संघटनेचे जयश्री खाडिलकर, प्रवीण घाग, जय प्रकाश भिलारे, निवृत्ती देसाई व नंदू पारकर हे नेते उपस्थित होते.