शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दापाेलीमध्ये लवकरच कुणबी भवन उभारू : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

दापाेली : कुणबी समाजोन्नती संघ कुणबी भवन मुंबई, विद्यार्थी वसतिगृह मुलुंडकरिता महाविकास आघाडी सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाच कोटी रुपये ...

दापाेली : कुणबी समाजोन्नती संघ कुणबी भवन मुंबई, विद्यार्थी वसतिगृह मुलुंडकरिता महाविकास आघाडी सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाच कोटी रुपये देण्यात आले आहेत. वसतिगृहाचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. आता दापाेलीमध्ये कुणबी भवन उभारून समाजाची गेली अनेक वर्षांची मागणी पूर्ण करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

कुणबी समाजोन्नती संघ कुणबी भवन मुंबईच्या मुलुंड येथील विद्यार्थी वसतिगृहाकरिता महाविकास आघाडी सरकारकडून पाच कोटी रुपये मिळवून दिल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचा शनिवारी दापोली येथे कुणबी समाजोन्नती संघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार तटकरे बाेलत हाेते. यावेळी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नगरसेवक खालिद रखांगे, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, जिल्हा परिषद सदस्य नेहा जाधव, पंचायत समिती सभापती योगिता बांद्रे, कुणबी समाजाचे नेते शंकर कांगणे, संदीप राजपुरे, रमेश पांगत उपस्थित होते.

कुणबी समाज उन्नती संघाची गेल्या ४० वर्षांची मागणी होती. ही मागणी खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेल्याचे कुणबी समाजाचे नेते शंकर कांगणे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कुणबी समाजातर्फे पाच मागण्या त्यांच्याकडे ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, उर्वरित मागण्याही पूर्ण हाेतील, असा विश्वास शंकर कांगणे यांनी व्यक्त केला.

यावेळी संदीप राजपुरे म्हणाले की, कुणबी समाजाने आजपर्यंत दिलेला शब्द नेहमीच पाळला आहे; परंतु या समाजाच्या पदरी निराशेशिवाय काहीही पडले नाही. यापुढे या समाजाचे हक्क घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी सांगितले. रमेश पांगत यांनी सांगितले की, दापोली तालुक्यातील कुणबी समाजाला हक्काचे समाजमंदिर मेळावा अशी भूमिका अनेक वर्षे मांडली जात आहे; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापुढे समाजाच्या हितासाठी यापुढे राजकारणापलिकडे जाऊन मैत्री करण्याची गरज आहे. यापुढे जो पक्ष आमच्या हिताचे काम करेल अशाच पक्षाला भविष्यात समाज मदत करेल, असे यावेळी ठामपणे सांगितले.

-------------------------

कुणबी समाजाला प्रतिनिधीत्व मिळालेच पाहिजे

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कधी काळी कुणबी समाजाचे नऊ आमदार होते; परंतु आता मात्र जिल्ह्यांमध्ये एकही आमदार नाही, ६५ टक्के असलेल्या या कुणबी समाजाला रत्नागिरी जिल्ह्यातून प्रतिनिधीत्व मिळावा, अशी भूमिका वेगवेगळ्या पक्षांकडे मांडण्यात आली. परंतु, समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नाही. यापुढे समाजाचा वाटा मिळालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका भविष्यात असणार आहे, असे यावेळी ठामपणे सांगण्यात आले.