शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

हापूस कमी असल्याने एसटीच्या माल वाहतुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

रत्नागिरी : गतवर्षी कोरोनाकाळात आंबा वाहतुकीचा प्रश्न उभा राहिला असतानाच एस.टी. शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली होती. एप्रिलमध्ये ...

रत्नागिरी : गतवर्षी कोरोनाकाळात आंबा वाहतुकीचा प्रश्न उभा राहिला असतानाच एस.टी. शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली होती. एप्रिलमध्ये आंबा वाहतूक करण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आंबा वाहतूक करण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे. मात्र, आंबा उत्पादनच कमी असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

रत्नागिरी विभागाने थेट आंबा बागायतदार, व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडील आंबा वाहतूक करण्याचा निर्णय घेतला. आंबा वाहतुकीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वाहतुकीची तयारी दर्शविली आहे. परंतु, आंबा कमी असल्याने मालवाहतुकीसाठी घाऊक पेट्या उपलब्ध होत नाहीत. किरकोळ स्वरूपात उपलब्ध होणाऱ्या पेट्यांची वाहतूक सध्या करण्यात येत आहे.

बागायतदारांच्या बागेतून किंवा पॅकिंग हाउसमधून थेट आंबा पेटी उचलण्याची तयारी एस.टी.ने दर्शविली आहे. एस.टी.ने नऊ आगारांत नियोजन केलेल्या ठिकाणी बागायतदारांनी पेट्या आणून देणे. एकाच व्यापाऱ्याकडे सर्व माल उतरविणे. शहरातील विविध भागांत ट्रक जाऊ शकेल, अशा ठिकाणी नगावर माल उतरविणे, असे पर्याय एसटीने बागायतदार, विक्रेत्यांसाठी उपलब्ध केले आहेत. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात पेट्या उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

चार, पाच, सहा डझनांच्या लाकडी पेटीपासून दोन डझनांच्या पुठ्ठ्यांच्या खोक्यापर्यंत सर्व प्रकारच्या पॅकिंगमधील आंबा वाहतुकीची तयारी दर्शविण्यात आली आहे. पुठ्ठ्यांचे खोके वजनामुळे फाटू शकतात. तळातील आंबा पेटीवर दाब पडून काहीवेळा लाकडी खोकाही तुटण्याचा संभव असतो. त्यामुळे पेट्या बसविताना योग्य नियोजन केले आहे.

गतवर्षी एकूण ३५०० आंबा पेट्यांची वाहतूक मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे, अकोला, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्यांत एसटीने आंबा पेट्यांची वाहतूक करण्यात आली होती. मात्र, यंदा आंबा कमी असल्याने फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

........................

लॉकडाऊनकाळात प्रवासी भारमान घटल्यामुळे महामंडळाने मालवाहतुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. ५३ मालवाहतूक गाड्यांमधून वाहतूक सुरू आहे. गतवर्षीप्रमाणे किफायतशीर दरात, राज्याच्या कानाकोपऱ्यांत आंबा वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, आंबा कमी असल्याने तितकासा प्रतिसाद लाभत नाही.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी