शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासकालीन राजापूर, कडक उन्हाळ्यातही १४ कुंडांमध्ये पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 13:32 IST

कडक उन्हाच्या झळा आता अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीने तळ गाठला असून, सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले असतानाच राजापूर तालुक्यातील गंगाक्षेत्री असणाऱ्या १४ कुंडांमध्ये मात्र आजही पुरेसे पाणी उपलब्ध आहे.

ठळक मुद्देइतिहासकालीन राजापूर, कडक उन्हाळ्यातही १४ कुंडांमध्ये पाणीसाठापाण्याचे दुर्भीक्ष्य असतानाही गंगाक्षेत्री मुबलक पाणी, स्नानासाठी भाविकांची गर्दी

राजापूर : कडक उन्हाच्या झळा आता अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीने तळ गाठला असून, सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले असतानाच राजापूर तालुक्यातील गंगाक्षेत्री असणाऱ्या १४ कुंडांमध्ये मात्र आजही पुरेसे पाणी उपलब्ध आहे.

इतिहासकालीन राजापूर शहराची ओळख सांगणारे महत्वाचे स्थान म्हणजे गंगाकुंड. मागील अनेक वर्षे दर तीन वर्षांनी याठिकाणी गंगा अवतीर्ण होते. त्यानंतर काही महिन्यांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते, असा तिचा प्रघात राहिला आहे.

मात्र, अलिकडच्या काही वर्षात गंगेचे आगमन व निर्गमन या प्रथेमध्ये बदल झाला असून, आता तर तिचे तीन वर्षांपूर्वीच आगमन व दीर्घकालानंतर निर्गमन असा क्रम सुरु आहे. यापूर्वी तर सलग दोन वर्षे गंगेचे आगमन झाले आहे.

साधारणपणे नोव्हेंबर ते मे असा गंगेचा आगमन कालावधी राहिला आहे. जूनमध्येदेखील तिचे आगमन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना त्यावेळी डोंगरांनी वेढलेल्या भागात एकाचवेळी १४ कुंडात पाणी उपलब्ध होते व त्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होऊनदेखील पाण्याचे प्रमाण जसेच्या तसे राहात असल्याचे पाहायला मिळते.

गंगाक्षेत्री काशीकुंडातील पाणी देण्यासाठी गंगापुत्र उपस्थित असतात. मात्र, तशी व्यवस्था अन्य कुंडात नसल्याने अनेकवेळा स्नानासाठी आलेले भाविक कुंडात उतरुन स्वत:च स्नान करतात. शिवाय इतरांनाही पाणी काढून देतात. पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊनही या कुंडातील पाण्याच्या पातळीत घट झालेली नाही.

बारमाही उष्ण झरा
राजापूर शहरापासून सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे गंगाक्षेत्र आहे. त्यालगतच बारमाही वाहणारे उष्ण पाण्याचे झरे म्हणजेच उन्हाळे हा भाग येतो. गंगाक्षेत्रावर येणारे भाविक प्रथम उन्हाळे येथे जावून गरम पाण्यात स्नानाचा लाभ घेतात. या पाण्यातही गंधकाचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. याठिकाणी आंघोळ करून भाविक गंगाक्षेत्रावर येतात.

टॅग्स :Rajapurchi Gangaराजापूरची गंगाRatnagiriरत्नागिरी