शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या पावसाचा ओघ बघता शेतकऱ्यांनी शेतीची काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

दापोली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सोमवारपासून पावसाचा आलेख वाढला आहे. मात्र, गुरुवारी पहाटे जोरदार पडणारा ...

दापोली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सोमवारपासून पावसाचा आलेख वाढला आहे. मात्र, गुरुवारी पहाटे जोरदार पडणारा पाऊस दुपारच्या सत्रात शांत झाला हाेता; मात्र मुंबई हवामान केंद्राकडून पावसाचा जोरदार तर अति जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची काळजी घेण्याचे आवाहन दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार आहे. पूर्व किनाऱ्याकडे येणाऱ्या या प्रणालीमुळे कोकण विभागात पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. कोकण विभागातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी काेसळल्या हाेत्या. तर २६ सप्टेंबर रोजी कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी जोरदार स्वरुपाच्या पावसाची तर मुंबई, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांची मात्रा, कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणीची कामे पुढे ढकलावीत. नवीन फळबाग लागवड केलेल्या कलमांच्या बुंध्याजवळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

तसेच भात, भाजीपाला पिके, भुईमूग, हळद, नारळ, सुपारी, चिकू, केळी, पपई बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. पक्व हळवे भात खाचरातून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होण्याचा आवाज ऐकण्यात आल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडाच्या आडोशाला उभे राहू नये तसेच पशुधनास निवाऱ्याच्या जागी बांधावे, झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू किंवा मोकळे सोडू नये, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.