शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

डी. एड्.च्या जागा २४०, अर्ज मात्र १०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST

रत्नागिरी : दोन वर्षे डी. एड्. करून वर्षानुवर्ष नोकरीअभावी बेरोजगार म्हणून राहावे लागत असल्याने डी. एड्. प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ ...

रत्नागिरी : दोन वर्षे डी. एड्. करून वर्षानुवर्ष नोकरीअभावी बेरोजगार म्हणून राहावे लागत असल्याने डी. एड्. प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. विद्यार्थी संख्या वाढावी, यासाठी डी. एड्. महाविद्यालयांनी प्रवेशासाठी गुणवत्तेची टक्केवारीही खाली आणली आहे. तरीही जिल्ह्यातील २४० जागांसाठी अवघ्या १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

जिल्ह्यात दोन अनुदानित, चार विनाअनुदानित डी. एड्. महाविद्यालये होती. त्यापैकी गेल्या पाच - सहा वर्षांतील विद्यार्थी गळतीमुळे दोन विनाअनुदानित महाविद्यालये बंद झाली आहेत. त्यामुळे दोन अनुदानित व दोन विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये एकूण २४० विद्यार्थी प्रवेश क्षमता असताना आतापर्यंत अवघे १० प्रवेश विद्यार्थ्यांनी घेतले आहेत. प्रवेश अर्जासाठी दि. २३ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

डी. एड्. पदविका अभ्यासक्रमानंतर नोकरीची खात्री असल्यामुळे दहा ते बारा वर्षांपूर्वी या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक होता. प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागत असे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला असल्याने मर्यादित जागा व प्रवेश अर्ज अधिक असल्याने ८९ ते ९० टक्केपर्यंत उच्चतम गुणवत्तेवर काही वर्षांपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागली होती.

मात्र, आठ वर्षांपूर्वी डी. एड्. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीसाठी टीईटी परीक्षा सक्तीची केली. शिवाय शिक्षक भरतीही २०१०नंतर बंद आहे. २०१७मध्ये ‘पवित्र पोर्टल’द्वारे राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया अद्याप रेंगाळली आहे. दोन वर्षे डी. एड्. करण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही नोकरीची शाश्वती नाही. खासगी संस्थेमध्ये अडीच ते तीन हजार रूपयांवर राबावे लागते अन्यथा बेरोजगार म्हणूनच राहावे लागते. पदवीधर नसल्यामुळे कारकून म्हणूनही खासगी संस्थांमध्ये काम मिळत नाही. गेल्या सात ते आठ वर्षांत जिल्ह्यात डी. एड्. झालेले हजारो विद्यार्थी बेरोजगार आहेत. ग्रामीण भागातील काही डीएडधारक तर उपजीविकेसाठी मजुरी करत आहेत. शासनाच्या अजब धोरणामुळे डीएड विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

शासकीय धोरणाचा परिणाम म्हणूनच डी. एड. महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील दोन विनाअनुदानित महाविद्यालये आधीच बंद झाली आहेत. रत्नागिरी, राजापूर येथील अनुदानित व खेड, सावर्डे येथील विनाअनुदानित महाविद्यालये सुरू आहेत. या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोजकीच असल्याने प्रवेशासाठी चक्क गुणवत्ताच खाली आणण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता ४४.५० टक्के, तर खुल्या संवर्गासाठी ४९.५० टक्के प्रवेशासाठी गुणवत्ता निश्चित केली आहे. काही वर्षांपूर्वी प्रवेशासाठी गर्दी होत असे. परंतु, आता विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रवेश घेण्यासाठी विनवणी केली जात आहे.