शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

टवाळखोर मुलांमुळे अमोल घागची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील दहीवली बुद्रुक लिमेवाडी येथील बीएस्सी आयटी झालेल्या अमोल घाग याने आठवडाभरापूर्वी केलेली आत्महत्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यातील दहीवली बुद्रुक लिमेवाडी येथील बीएस्सी आयटी झालेल्या अमोल घाग याने आठवडाभरापूर्वी केलेली आत्महत्या ही वाडीतील टवाळखोर मुलांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे असल्याचा आरोप त्याचे वडील हेमकिरण घाग यांनी केला आहे. मृत्यूनंतर त्याच्या पाकिटातील चिठ्ठी व मोबाईलमधील ऑडिओ क्लिपमध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट होत आहे़ चिठ्ठी आणि मोबाईल पोलिसांकडे देऊन याबाबत चौकशी करण्याची अपेक्षा वडील हेमकिरण घाग यांनी व्यक्त केली आहे.

अमोलच्या वडिलांनी जबाबात म्हटले आहे की, अमोलने ५ मे रोजी गोठ्यामध्ये आत्महत्या केली होती. आकस्मिक मृत्यू म्हणून सावर्डे पोलीस स्थानकात याची नोंद झाली आहे. अमोल याचे शिक्षण बीएस्सी आय.टी. होते. तो लुपिन या औषध कंपनीमध्ये नोकरीला होता. त्यापूर्वी तो अल्वम या कंपनीत होता. ३० एप्रिलला त्याने लुपिन कंपनीचा राजीनामा दिला. तत्पूर्वी अनोम या औषध कंपनीमध्ये असताना तो व त्याचे त्याच कंपनीतील मित्र रवींद्र पांडे व योगेश पोतदार यांनी लिन्कलिन या फार्मा कंपनीचे डिस्ट्रीब्युटर देशमुख यांच्याकडून कंपनी विकत घ्यायचे ठरविले होते; परंतु कोरोनामुळे ती प्रक्रिया झाली नाही. त्या मुदतीत पांडे व पोतदार हे देशमुख यांच्या लिन्कलिन कंपनीमध्ये टक्केवारीवर काम करीत होते. अमोल याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मोबाईलचा पासवर्ड याेगेशला पाठविला होता. अमोलचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याने त्या पासवर्डच्या आधारे अमोलचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये एक ऑडिओ क्लिप सापडली. त्या क्लिपमध्ये अमोलने आत्महत्या करण्यापूर्वी मित्रांसह चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या वाडीतील काही लोकांनी त्याला मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे.

अमोलचे ज्या मुलीशी वर्षभरापूर्वी लग्न ठरलेले होते त्या मुलीचे व अमोलचे वैयक्तिक संवाद, फोटो लिक होत होते. त्याबाबत वाडीतील टवाळ मुले त्याला विचारत असत. त्याची टिंगल करीत असत. तो त्याचा मोबाईल हॅक झाल्याचे आम्हाला सांगत असे म्हणून आम्ही त्याला तीन -चार मोबाईल बदलून दिलेले होते. तरीही त्याचा मोबाईल हॅक झाल्याचे त्याने ऑडिओ क्लिपमध्ये सांगितले आहे. तत्पूर्वी, अमोलला योग्य त्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला. तू त्या टवाळ मुलांकडे लक्ष देऊ नकोस, असे सांगितले. आमच्या समाधानासाठी मानसपोचार तज्ज्ञांकडे उपचार केले; परंतु अमोलमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्याचे व त्याच्या होणाऱ्या पत्नीचे संवाद गावामध्ये लिक होत होते. त्यामुळे त्या टवाळ लोकांच्या त्रासामुळे अमोल मानसिकदृष्ट्या खचत चालला होता. त्यामुळे ज्यांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले त्यांची चौकशी करून कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी विनंती अमोलच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.