शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:02 IST

Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh News: इथे आम्हाला लढण्याची शक्ती मिळणार आहे. महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा आहे, अशा भावना देशमुख कुटुंबाने रायगडावर पोहोचल्यावर व्यक्त केल्या.

Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh News: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यभरात अद्यापही चर्चेत आहे. यासंदर्भात आता पुढील न्यायालयीन लढाई सुरू आहे. संतोष देशमुख यांची हत्या किती निर्घृण पद्धतीने करण्यात आली, याची माहिती समोर येताच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. संतोष देशमुख प्रकरणावरून आजही आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता न्याय मिळावा, यासाठी देशमुख कुटुंब लढा देत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख, बंधू धनंजय देशमुख रायगडावर गेले आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांवर जेव्हा अन्याय झाला, तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना न्याय मिळवून दिला. तसेच ज्यांनी असे अन्याय करणारे कृत्य केले, त्यांना कठोर शिक्षा दिली. आजही महाराष्ट्रात माझ्या वडिलांची हत्या झाली, तशी अनेकांची हत्या झालेली आहे. या सरकारकडून मला हीच अपेक्षा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जशी शिक्षा देण्याची प्रथा होती तीच प्रथा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी वापरली तर राज्यातील गुन्हे थांबतील, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा

गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना  साकडे घालणार आहे. महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा आहे, असे वैभवी देशमुख यांनी सांगितले. प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की, त्यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. आम्ही संकल्प करणार आहोत. इथे आम्हाला लढण्याची शक्ती मिळणार आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. ज्या मावळ्यांना, ज्या प्रजेला न्याय द्यायचे काम त्यांनी केले. तसेच या शासनाने केले पाहिजे. महाराष्ट्रात एक उदाहरण घालून द्यायला हवे की, इथे गुन्हेगारीला कुणीही साथ देणार नाही. गुन्हेगारी कायमची कशी संपवली जाईल. याकडे लक्ष दिले पाहिजे. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बंधू धनंजय देशमुख यांनी केली.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगड वर पार पडतोय. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आज राज्यातील तीन ते चार लाख शिवभक्त गडावर दाखल झालेत. छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. याचा उत्साह गडावर पाहायला मिळतोय.

 

टॅग्स :Shivrajyabhishekशिवराज्याभिषेकRaigadरायगडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या