शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत मतदारसंघातून सुरेश लाडच आघाडीचे उमेदवार, पत्रकार परिषदेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 02:53 IST

आमदार सुरेश यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीतून माघार घेतल्याने दोन दिवस सुधाकर घारे हे विधानसभा निवडणूक लढवतील, अशी उलटसुलट चर्चा सुरू होती; परंतु ही चर्चा चुकीची होती.

नेरळ : आमदार सुरेश यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीतून माघार घेतल्याने दोन दिवस सुधाकर घारे हे विधानसभा निवडणूक लढवतील, अशी उलटसुलट चर्चा सुरू होती; परंतु ही चर्चा चुकीची होती. आमदार सुरेश लाड यांनी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर यांना विधानसभा निवडणूक लढवावी अशी विनंती केली होती; परंतु विधानसभा ही आमदार सुरेश लाड यांनीच लढवावी, अशी सर्व कार्यकत्यांची इच्छा आहे. आघाडीचे उमेदवार सुरेश लाडच असतील, अशी घोषणा सुधाकर घारे यांनी आघाडीच्या पत्रकार परिषदेत केली.कर्जत मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, एसआरपी व अन्य समविचारी पक्ष महाघाडीच्या उमेदवारी संदर्भात पूर्ण घोषणा करण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आघाडीचे उमेदवार आमदार सुरेश लाडच असतील, अशी घोषणा पत्रकार परिषदेत आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. या वेळी शेकापचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांनीदेखील शेतकरी कामगार पक्ष आमदार सुरेश लाड यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. आमदार सुरेश लाड यांनीच ही निवडणूक लढवलीच पाहिजे असे सांगतले. तसेच काँग्रेसचे मुकेश सुर्वे तसेच आघाडीच्या सर्वच नेत्यांनी लाड यांना पाठिंबा दिला.या वेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या हनुमंत पिंगळे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांवर टीका करत त्या उमेदवाराला घरी बसविल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे सांगितले. आमदार सुरेश लाड हे आघाडीचे उमेदवार असल्याचे संकेत असताना चार दिवसांपूर्वी आमदार सुरेश लाड हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आणि चर्चा सोशल मीडियावर होत होती; परंतु सोमवारी शिवसेनेने महेंद्र थोरवे यांना एबी फॉर्म दिल्याने थोरवे यांची उमेदवारी नक्की झाली. त्यामुळे सुरेश लाड यांच्या पक्षप्रवेश अफवांवर अखेर पडदा पडला. त्यानंतर सोमवारी सायंकाळी लाड यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी निवडणूक लढवत नसल्याचे जाहीर केले होते.त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती. दोन दिवसात अनेक घडामोडी घडल्याने मोठा बदल घडून आला आहे. शिवसेनेचे २०१४ साली निवडणूक लढविलेले हनुमंतपिंगळे यांनी खासदार तटकरे आणिआमदार सुरेश लाड यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातजाहीर प्रवेश केला त्यानंतर राजकीय गणिते बदल्यांस सुरुवात झाली.या पत्रकार परिषदेस आमदार सुरेश लाड, हनुमंत पिंगळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे, समाज कल्याण सभापती नारायण डामसे, शिक्षण सभापती नरेश पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, तानाजी चव्हाण, शेकापचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.चार वेळा उमेदवारी मिळाली असून तीन वेळा आमदार झालो आहे. त्यात मी समाधानी आहे; परंतु आजची निवडणूक ही खर्चिक झाली असल्याने मी ही निवडणूक लढवत नसल्याचे सांगितले होते. तसेच पक्षश्रेष्ठीकडेही तसे कळविले होते. दुसरा उमेदवार निवडा असेदेखील सांगितले होते; परंतु दोन दिवस कार्यकर्त्यांची विनंती आणि कर्जत-खालापूर तालुक्यात शांतता राहावी यासाठी तुम्हीच उमेदवारी घ्यावी, अशी विनंती केल्याने ही उमेदवारी स्वीकारत आहे.- सुरेश लाड, आमदार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019karjat-acकर्जत