शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

रायगड जिल्ह्यात सातपैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीची बाजी; श्रीवर्धन महाआघाडीच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:20 AM

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांचे निकाल हे अनपेक्षित लागले आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांचे निकाल हे अनपेक्षित लागले आहेत. शिवसेनेने तीन जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर भाजपने दोन जागा सहजपणे खिशात घातल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली जागा कायम ठेवण्यात यश संपादन केले आहे. उरणमध्ये बंडखोरी झाल्याने ही जागा मात्र अपक्षाच्या पदरात पडली आहे. लागलेल्या निकालावरून मतदारांनी शेकापला दूर करतानाच काँग्रेसला सपशेल नाकारल्याचे दिसून येते. या ठिकाणी निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भगवे झेंडे फडकवत त्यांनी आनंद साजरा केला.

गुरुवारी मतमोजणी केंद्रांवर २४ ते २७ फेऱ्यांच्या माध्यमातून निकाल पुढे येत होता. तसा उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांच्या काळजात धाकधूक वाढत होती. सुरुवातीपासूनच महायुतीच्या उमेदवारांनी मतांमध्ये आघाडी घेण्याला सुरुवात केली होती. पुढच्या फेरीत तरी निदान आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळेल, असे शेकाप, काँग्रेसच्या उमेदवारांना वाटत होते. मात्र, अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी, पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले, पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर आणि श्रीवर्धनमधीलराष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे या उमेदवारांनी सुरुवातीपासूच मतांचा मोठा आकडा गाठला.

त्यानंतर पुढील प्रत्येक फेरीमध्ये त्यांचे मताधिक्य हे वाढतच गेले. त्यामुळे विरोधी गोटामध्ये शांतता पसरली होती. आपला उमेदवार पडणार हे साधारणपणे १५ व्या फेरीनंतर दिसून येत होते. त्यानंतर हळूहळू उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. मतदान केंद्रातून निकाल बाहेर पडण्याआधी बाहेरूनच फेरीनिहाय मतांची आकडेवारी सोशल मीडियावर फिरत होती. त्यामुळे केंद्राबाहेरील समर्थकांमध्ये कमालीचा उत्साह संचारल्याचे चित्र होते.

शेकापला पूर्णपणे अपयश

जिल्ह्यातील सात मतदारसंघ आहेत. यात महायुती विरुद्ध महाआघाडी यांच्यात सरळ लढत होती. त्यात महायुतीने पाच जागा जिंकल्या. आघाडीने एका जागेवर यश मिळविले तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला. शिवसेनेने तीन, भाजपने दोन, राष्ट्रवादी काँग्रेसने एक मतदारसंघात विजय मिळवला आहे. उरणमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.रायगड जिल्ह्यात अलिबाग, पनवेल, उरण, कर्जत, महाड, पेण, श्रीवर्धन असे सात मतदारसंघ आहेत. पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी, कर्जतमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे, पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे तर उरणमध्ये अपक्ष महेश बालदी विजयी झाले आहेत. शेकापला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. रायगडमध्ये एकही जागेवर विजय न मिळविण्याची शेकापची ही पहिलीच वेळ आहे.

प्रशांत ठाकूर यांची हॅट्ट्रिकपनवेलमध्ये भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी, तर महाडमध्ये शिवसेनेचे आ. भारत गोगावले यांनी सलग तीन वेळा निवडून येऊन हॅट्ट्रिक केली. काँग्रेसलाही भोपळा फोडता आला नाही.अलिबाग आणि पेण मतदारसंघामध्ये काँग्रेस आघाडीत नव्हती. त्यामुळे येथे स्वतंत्र उमेदवार उभे केले. मात्र, शेकापला मदत करण्यासाठीच काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. हे मतदारांना पटवण्यात शिवसेना-भाजप यशस्वी ठरल्यानेच काँग्रेसची मते ही अन्यत्र वळली.शेकापने अलिबाग मतदारसंघात नऊ वेळा तर एकदा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंड्याखाली निवडणूक जिंकली होती. काँग्रेसने चार वेळा आमदारकीवर शिक्कामोर्तब केले होते. शिवसेनेने या मतदारसंघात आमदार होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले नव्हते. महेंद्र दळवी यांनी २०१४ च्या निवडणुकीत शेकापक्षासमोर आव्हान उभे केले होते; परंतु या वेळी शेकापचा विजय झाला होता. आता मात्र त्यांनी शेकापला धूळ चारत प्रथमच अलिबागवर भगवा फडकवला.

निवडणूक ठरली ऐतिहासिक

यंदाची विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शेकापला व्हाइट वॉश मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शेकापचा एकही उमेदवार निवडून न येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. पनवेलमध्ये भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तर महाडमध्ये शिवसेनेचे आमदार भारत गोगावले यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी तर पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील यांच्या रूपाने बºयाच वर्षांनी विजय संपादित करता आला आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनीही उरणमध्ये विजय मिळविला आहे.

पनवेल मतदारसंघात भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी शेकापचे हरेश केणी यांचा तब्बल ९२ हजार ३७० मतांनी पराभव करत ते जायंट किलर ठरले आहेत. प्रशांत ठाकूर यांना १ लाख ७८ हजार ५८१ मते मिळाली, तर शेकापचे हरेश केणी यांना ८६ हजार २११ मते मिळाली आहेत.या निकालांची काही ठळक वैशिष्ट्ये

पेण मतदारसंघामध्ये काँग्रेसचे रवींद्र पाटील यांचा भाजपप्रवेश करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चांगलीच खेळी केली. भाजपने रवींद्र पाटील त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. त्यामुळे चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णय योग्य ठरला आहे.विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या विरोधात शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. त्यांनी उमेदवारही उभे केले. मात्र, युतीच्या विरोधात शेकाप आणि काँग्रेसचे उमेदवार तग धरू शकले नाहीत.

उरण मतदारसंघामध्ये भाजपचे महेश बालदी यांनी केलेली बंडखोरी भाजपला रोखता आली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात बालदी यांनी निवडणूक लढली आणि ते जिंकलेही, त्यामुळे शिवसेना बंडखोरीची किंमत चुकवावी लागली, शिवाय उरणची हातची जागाही गेली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019shrivardhan-acश्रीवर्धनNCPराष्ट्रवादी काँग्रेस