शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मराठा अारक्षणासाठी सरकारकडे प्लॅन बी अाहे का ; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 18:37 IST

Maratha Reservation: पृथ्वीराज चव्हाण यांनी अाज लाेकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी मराठा अारक्षणापासून ते येणाऱ्या निवडणूका या सर्वच विषयांवर त्यांनी संवाद साधला.

पुणे : मराठा अारक्षणासंदर्भात सरकार मागासवर्गीय अायाेगाच्या निर्णयावर भर देत असून मागासवर्गीय अायाेग मराठा समाजाच्या बाजूनेच निकाल देईल असे गृहित धरले जात अाहे. परंतु मागासवर्गीय अायाेगाने मराठा समाजाला अारक्षण देणे शक्य नसल्याचा अहवाल दिल्यास सरकारकडे प्लॅन बी अाहे का असा थेट सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अाज चव्हाण यांनी लाेकमत कार्याला सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बाेलत हाेते. 


    चव्हाण यांनी साधलेल्या संवादात त्यांनी अारक्षणापासून ते 2019 च्या लाेकसभा निवडणूका अशा सर्वच विषयांवर अापले मत व्यक्त केले. मराठा अारक्षणासंदर्भात सरकार वेळ काढूपणा करत असल्याने मराठा अांदाेलन चिघळत असल्याचा अाराेप त्यांनी यावेळी केला. तसेच धनगर अारक्षणाची घाेषणा करुनही त्या समाजाला अारक्षण न दिल्याने मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. चव्हाण म्हणाले, इतके मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले परंतु त्यांनी मराठा समाजाच्या अारक्षणासाठी काही केले नाही असा जाे अाराेप केला जाताे, ताे खाेटा अाहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला अारक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली हाेती. त्यावेळच्या बापट अायाेगाने मराठा समाजाला अारक्षण देता येणार नाही असा अहवाल दिला हाेता. याबाबतची साधार माहिती देण्यास बापट अायाेगाने नकार दिला हाेता. त्यावेळी राणे समिती नेमून या अारक्षणासंदर्भात माहिती गाेळा करण्यास सांगितले हाेते. राणे समितीने 20 टक्के मराठा समाजाला अारक्षण देण्यात यावे असा अहवाल दिला हाेता. तसा अाम्ही कायदाही केला. जुलै 2014 मध्ये कायदा हा अद्यादेश रुपाने अाम्ही अाणला. त्यानुसार मराठा समाजातील मुलांना अारक्षण मिळण्यास सुरुवात झाली हाेती. परंतु या अध्यादेशाला काेर्टात अाव्हान देण्यात अाले व ताे अध्यादेश रद्द करण्यात अाला हाेता. ज्या बिलाला काेर्टाने स्थगिती दिली हाेती, त्यात कुठलेही बदल, सुधारणा न करता फडणवीस सरकारने तेच बिल सादर केले. त्यामुळे या सराकारला मराठा समाजाला अारक्षण द्यायची इच्छा अाहे असे वाटत नाही. 

    माेदींच्या कार्यपद्धतीबाबत बाेलताना चव्हाण म्हणाले, माेदी हे हुकुमशाह सारखे वागत अाहेत. त्यांच्या अश्या वागण्याने जनतेबराेबरच भाजपातील काही लाेकही नाराज अाहेत. अात्तापर्यंत झालेली सर्व अांदाेलने ही अार्थिक अांदाेलने अाहेत. तरुणांना अाज नाेकऱ्या मिळत नाहीत. देश वाचावायचा असेल तर भाजपाचा पराभव करावा लागेत. भाजपाचा राज्यात पराभव करण्यासाठी सर्व विराेधीपक्ष एकत्र येतील. देशातही सर्व विराेधी पक्षांना एकत्र अाणण्याचा काॅंग्रेसचा प्रयत्न अाहे. त्यासाठी साेनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विराधी पक्षांचे गठबंधन व्हावे. माेदीेंना पराभूत करण्यासाठी येत्या काळात महाअाघाडी अावश्यक अाहे. 

खालील लिंकवर क्लिक करुन बघा पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1871591109574074&id=132309676835568

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा