शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

संचारबंदी, वर्क फ्रॉम होममुळे वाढणाऱ्या वजनावर घरातच 'असे' मिळवा नियंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 5:37 PM

संचारबंदीमुळे घरातच कैद होण्यातील तोटे आता समोर येऊ लागले आहेत. त्यातला सर्वात मोठा तोटा वाढत्या वजनाचा. ते आटोक्यात कसे ठेवावे.याविषयी काही तज्ञांच्या टिप्स....

ठळक मुद्देखाण्याविषयी जागरूक राहणेच गरजेचे अगदी थोड्या आणि सोप्या प्रयत्नांमधूनही आपले वजन आपण ताब्यात ठेवू शकतो

पुणे: कोरोनामुळे लादण्यात आलेल्या संचारबंदीचे तोटे आता पुढे येऊ लागले आहेत. शारीरिक हालचाल बंद आणि खाणे जास्त होऊ लागल्याने वजन वाढले जात अनेकांसमोर ही समस्या निर्माण होत आहे.

फिटनेस तज्ञ मनाली मगर : व्यायाम म्हणजे काही कष्टकरी क्रिया असा अनेकांचा समज आहे. मात्र अगदी थोड्या आणि सोप्या प्रयत्नांमधूनही आपले वजन आपण ताब्यात ठेवू शकतो, ते कमी होत नसले तरी वाढतही नाही व आताच्या काळात त्याचीच गरज आहे.* काय करावे: सकाळी ऊठताना पटकन ऊठून कामाला लागू नका. शांतपणे बसा, कायकाय करायचे आहे त्याणी मनातच यादी करा. याने मन शांत होईलआवरून झाले की मांडी घालून स्वस्थ बसा. एक नाकपूडी बंद करायची, दीर्घ श्वास घ्यायचा व दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. एरवी आपण श्वास खोलपर्यंत जाऊच देत नाही. यात तो थेट पोटापर्यंत जाऊ द्यायचा व नंतरच सोडायचा. असे किमान २७ वेळा करायचे. मन शांत होईलयानंतर सूर्य नमस्कारासारखा व्यायाम किंवा अगदी शाळेत शिकला असाल ती पीटी केली तरी चालेल, मात्र त्यात नियमितता हवी. शरीराला काही एक ताण पडायला हवा. रोजच्या कामांमधून महिलांना हा व्यायाम होऊ शकतो, पण पुरूषांचे तेही होत नाही. त्यामुळे रोजचे चालणे, काही कामे करणे यातूनही व्यायाम होईल. अधिक ताण द्यायचा तर जीम करायला हवे किंवा व्यायाम प्रकार वाढवायला हवे.....................................................

.

आहारतज्ञ विभूषा जांभेकर: घरात बसून जास्त.खाल्ले जाते, नको तेच खाल्ले जाते व त्यातून वजन वाढते. या काळात खाण्याविषयी जागरूक राहणेच गरजेचे आहे, तरच वजन नियंत्रणात राहू शकते.

* काय करावे: रोजच्या जेवणातील किमान ४० टक्के आहार हा कच्चा असावा. म्हणजे वाफवलेली कडधान्ये, इतकेच नाहीतर गाजर, काकडी, सँलड अशा गोष्टीही कच्च्याच खाव्यात. खाताना कधीही टीव्ही मोबाईल याचा वापर करू नये. पोट भरले.हा संदेश मेंदूपर्यंत जाण्याच्या क्रियेत यामुळे अडथळा येतो व त्यातून खाणे वाढते.* शरीराला हालचाल नाही तर साखर शक्यतो आहारात येऊच देऊ नये. गोडाची आवडच असेल तर खजूराचा किस, खारकेची पूड अशी नैसर्गिक साखर खावी.तेलकट, तळलेले, ब्रेड, पाव याचा अतिरेक टाळला नाही तर वजन वाढणारच हे नक्की आहे. त्यामुळे या गोष्टी आहारात नकोच. त्याऐवजी सर्व कडधान्याची मिसळ, त्यावर कांदा लिंबू किंवा बाजरी ज्वारी यालाही मोड येतात, ते भिजवून त्याची खिचडी असे पदार्थ करावेत. 

* दोन वेळा जेवण, दोन वेळच्या खाण्यात किमान ६ तासांचे अंतर या लहानलहान गोष्टींमधूनही वजन आटोक्यात ठेवणे शक्य आहे असा विश्वास जांभेकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्न