शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला २०१४ पासून संचालक नसल्याने कारभार प्रशासकीय

By राजू इनामदार | Updated: April 22, 2026 14:26 IST

कामगारांची कैफियत- ( भाग १ ) प्रशासकीय कारभार : कामगार वर्गात ना प्रचार, ना प्रसार!

पुणे : राज्यातील करोडो कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कायद्याने स्थापलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला २०१४ पासून संचालक मंडळच नाही. ६० लाखांपेक्षा अधिक कंपन्यांची नोंदणी, त्यांच्याकडून दरवर्षी मिळणारा २०० कोटी रुपयांचा निधी, त्यातून कामगार कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या अनेक योजना याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. ज्यांच्यासाठी मंडळ अस्तित्वात आले, त्या कामगार वर्गातच मंडळाच्या योजनांचा प्रभावी प्रसार होताना दिसत नाही.

राज्यातील सर्व कामगार मंडळांमध्ये ४० टक्के विविध पदे रिक्त आहेत. तिथे नवी भरती बंद असल्याने कर्मचारी अतिरिक्त कामाच्या तणावाने त्रस्त आहेत. थेट कामगार वर्गात जाणारे कर्मचारी मंडळाकडे नसल्याने मंडळाच्या योजनांचा प्रचार होत नाही, किंबहुना ते काम जवळपास बंद झाल्यातच जमा आहे. ‘कामगार कल्याण मंडळ’ आहे, हे अनेक कामगारांनाच माहिती नाही. कामगार संघटनांही याबाबत प्रसार करत नाही. उपसचिव दर्जाचे अधिकारी प्राधिकृत करून सरकारने आपले अंग मंडळातून काढून घेतले आहे.

साठ वर्षांपूर्वी महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार मंडळाची स्थापना करण्यात आली. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी साठी आरोग्य, शिक्षण, क्रीडा व अन्य क्षेत्रांत योजना राबवण्याचा मंडळाचा उद्देश आहे. पण, त्यासाठी मंडळात कामगार राज्यमंत्री मंडळाचे अध्यक्ष व विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ संचालक, असे २६ संचालक असायला हवेत. संचालक मंडळाने कामगारांच्या गरजेनुसार योजना आखाव्यात आणि प्रशासनाने राबवाव्यात, असे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र सर्व कामकाज प्रशासनाच करत आहे. जुन्याच योजनांवर मंडळाचे काम सुरू आहे.

पाच किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असणाऱ्या आस्थापनेला (कंपनी, उद्योग, व्यवसाय) मंडळाकडे नोंदणी करावीच लागते. त्यासाठी वर्षातून दोन वेळा प्रत्येक कामगाराच्या वेतनातून २५ रुपये, मालक म्हणून स्वत:चे ७५ रुपये मंडळाला देणे बंधनकारक आहे. राज्यात अशा ६० लाखांपेक्षा जास्त कंपन्यांची मंडळाकडे नोंदणी आहे. त्याशिवाय सरकारही वर्षातून दोन वेळा मंडळाला कामगार निहाय ५० रुपये निधी देत असते. यातून मंडळाकडे दरवर्षी २०० कोटी रुपये जमा होतात. त्यातून प्रशासकीय व कल्याणकारी योजनांचा खर्च केला जातो.

प्रशासकीय स्तरावर मंडळाचे मुख्यालय मुंबईत असून, कामगार कल्याण आयुक्तालय आहे. महसुली विभागाप्रमाणे प्रत्येक विभागात सहायक कल्याण आयुक्त, प्रत्येक जिल्ह्याला कामगार कल्याण अधिकारी आहे. काही जिल्ह्यांमध्ये गट कार्यालये आहेत. तिथे केंद्र संचालक प्रमुख आहेत. ही महत्त्वाची मुख्य पदेच अनेक ठिकाणी रिक्त आहेत. 

कामगारांची भरती करण्यावर सरकारची बंदी वगैरे नाही. कामगार भरती करणे मंडळाचे काम आहे. ते क्लिष्ट असते. त्यात अनेक तांत्रिक गोष्टी असतात. त्याला वेळ लागतो. प्रक्रिया सुरू आहे. मंडळाचे काम व्यवस्थित सुरू आहे. पाल्यांसाठी शिष्यवृत्तीपासूनच्या सर्व योजना सुरू आहेत.  - भास्कर मोर्डे, कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Labor Welfare Board without directors since 2014, run administratively.

Web Summary : The Maharashtra Labor Welfare Board, lacking directors since 2014, manages crores of rupees administratively. Many posts are vacant, hindering worker outreach and awareness of welfare schemes, despite substantial funds and registrations.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे