शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

...त्या महिलांची पोलिसांकडून छळवणूक होणार बंद; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 18:35 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे हे बंद होणार असल्याचा आनंद स्वच्छेने देहविक्रय करणाऱ्या महिलांनी व्यक्त केला.

नम्रता फडणीस

पुणे : पोलिसांकडून सामाजिक सुरक्षेच्या नावाखाली छळवणूक व्हायची. स्वयंसेवी संस्थांनी टारगेट पूर्ण करायचे म्हणून पुनर्वसनाच्या नावाखाली डांबून ठेवायचे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे हे बंद होणार असल्याचा आनंद स्वच्छेने देहविक्रय करणाऱ्या महिलांनी व्यक्त केला.

देहविक्रय हा व्यवसाय आहे, गुन्हा नाही. त्यामुळे सन्मानाची वागणूक मिळणे हा देहविक्रय करणाऱ्यांचा घटनात्मक अधिकार असून, स्वेच्छेने हा व्यवसाय करणाऱ्या सज्ञान व्यक्तींविरोधात पोलिसांना कारवाई करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

यापार्श्वभूमीवर स्वेच्छेने देहविक्रय करणाऱ्या महिलांशी संवाद साधला असता, आता पोलीस आम्हाला त्रास देणार नाहीत आणि अटकही करणार नाहीत असे सांगत त्यांनी आनंद व्यक्त केला. एक महिला म्हणाली, मी देहविक्रयच्या व्यवसायात स्वेच्छेने आले आहे. याद्वारे पैसा कमवून मी मुलांना चांगले शिक्षण देऊ शकले, घर बांधले. मला हा व्यवसाय करायचा आहे. पण देहविक्रय करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना जबरदस्तीने संस्थेत डांबले जाते. तिथे आम्ही काय काम करणार? माझ्या मुलांना मी हा व्यवसाय करते हे माहिती आहे आणि त्यांनी ते स्वीकारले आहे, मग समाजाला का खुपते? तुम्हाला जसे काय काम करायचे हे ठरवण्याचा अधिकार आहे. 

देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या ’सहेली’ संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, पोलिसांकडून एखाद्या ठिकाणी छापा टाकताना महिलांना मारहाण केली जाते. ती होता कामा नये. त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी. त्यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन होता कामा नये असा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ आहे. छापा टाकल्यानंतर पोलीस सरसकट महिलांना उचलून नेतात. सज्ञान किंवा स्वेच्छेने आल्या असल्या तरी त्यांना काहीही न विचारता संस्थांमध्ये भरती करून टाकतात.

आम्हाला ठरवू द्या ना कोणतं काम करायचंय? त्याला चुकीचे ठरवणारे तुम्ही कोण? 

आता त्यानिमित्ताने एक सर्वेक्षण होईल. त्यांना कायदेशीर वकील मिळून त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होईल. महिला स्वत:हून या व्यवसायात येतात, हेच आजवर कुणी मान्य करायला तयार नव्हते, ते आता मान्य झालेले आहे. आपल्याकडे देहविक्रय करणं हा कधीच गुन्हा नव्हता; पण अँटी ट्रँफिकिंगसाठी काम करणाऱ्या संस्थांना त्यांची उद्दिष्ट्ये पूर्ण करायची असतात. म्हणून मग महिलांना फूस लावून आणलंय, असं भासवलं जाते, अशा संस्थांना आता चपराक बसणार आहे.

देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल 

''सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महिलांना सामाजिक न्याय मिळेल. केंद्र सरकारचा ‘प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्राफिक ॲक्ट’ (पिटा) हा कायदा आहे. याकरिता कायद्यात काही तरतुदी कराव्या लागतील. हा निर्णय त्या केसपुरता लागू आहे का किंवा सर्वांना बंधनकारक आहे, हे बघावे लागेल. देशात हा निर्णय लागू होणार असेल तर त्यातील छोट्या-छोट्या बाबींचा नीट विचारपूर्वक अभ्यास करावा लागेल. या निर्णयाची लगेचच अंमलबजावणी होईल, असे नाही; मात्र स्वेच्छेने देहविक्रय करणाऱ्या महिलांना मान्यता देण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे, असे म्हणता येईल.'' -  राजेश पुराणिक (पोलीस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग) 

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायWomenमहिलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय