शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

...त्या महिलांची पोलिसांकडून छळवणूक होणार बंद; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 18:35 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे हे बंद होणार असल्याचा आनंद स्वच्छेने देहविक्रय करणाऱ्या महिलांनी व्यक्त केला.

नम्रता फडणीस

पुणे : पोलिसांकडून सामाजिक सुरक्षेच्या नावाखाली छळवणूक व्हायची. स्वयंसेवी संस्थांनी टारगेट पूर्ण करायचे म्हणून पुनर्वसनाच्या नावाखाली डांबून ठेवायचे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे हे बंद होणार असल्याचा आनंद स्वच्छेने देहविक्रय करणाऱ्या महिलांनी व्यक्त केला.

देहविक्रय हा व्यवसाय आहे, गुन्हा नाही. त्यामुळे सन्मानाची वागणूक मिळणे हा देहविक्रय करणाऱ्यांचा घटनात्मक अधिकार असून, स्वेच्छेने हा व्यवसाय करणाऱ्या सज्ञान व्यक्तींविरोधात पोलिसांना कारवाई करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

यापार्श्वभूमीवर स्वेच्छेने देहविक्रय करणाऱ्या महिलांशी संवाद साधला असता, आता पोलीस आम्हाला त्रास देणार नाहीत आणि अटकही करणार नाहीत असे सांगत त्यांनी आनंद व्यक्त केला. एक महिला म्हणाली, मी देहविक्रयच्या व्यवसायात स्वेच्छेने आले आहे. याद्वारे पैसा कमवून मी मुलांना चांगले शिक्षण देऊ शकले, घर बांधले. मला हा व्यवसाय करायचा आहे. पण देहविक्रय करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना जबरदस्तीने संस्थेत डांबले जाते. तिथे आम्ही काय काम करणार? माझ्या मुलांना मी हा व्यवसाय करते हे माहिती आहे आणि त्यांनी ते स्वीकारले आहे, मग समाजाला का खुपते? तुम्हाला जसे काय काम करायचे हे ठरवण्याचा अधिकार आहे. 

देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या ’सहेली’ संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, पोलिसांकडून एखाद्या ठिकाणी छापा टाकताना महिलांना मारहाण केली जाते. ती होता कामा नये. त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी. त्यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन होता कामा नये असा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ आहे. छापा टाकल्यानंतर पोलीस सरसकट महिलांना उचलून नेतात. सज्ञान किंवा स्वेच्छेने आल्या असल्या तरी त्यांना काहीही न विचारता संस्थांमध्ये भरती करून टाकतात.

आम्हाला ठरवू द्या ना कोणतं काम करायचंय? त्याला चुकीचे ठरवणारे तुम्ही कोण? 

आता त्यानिमित्ताने एक सर्वेक्षण होईल. त्यांना कायदेशीर वकील मिळून त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होईल. महिला स्वत:हून या व्यवसायात येतात, हेच आजवर कुणी मान्य करायला तयार नव्हते, ते आता मान्य झालेले आहे. आपल्याकडे देहविक्रय करणं हा कधीच गुन्हा नव्हता; पण अँटी ट्रँफिकिंगसाठी काम करणाऱ्या संस्थांना त्यांची उद्दिष्ट्ये पूर्ण करायची असतात. म्हणून मग महिलांना फूस लावून आणलंय, असं भासवलं जाते, अशा संस्थांना आता चपराक बसणार आहे.

देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल 

''सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महिलांना सामाजिक न्याय मिळेल. केंद्र सरकारचा ‘प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्राफिक ॲक्ट’ (पिटा) हा कायदा आहे. याकरिता कायद्यात काही तरतुदी कराव्या लागतील. हा निर्णय त्या केसपुरता लागू आहे का किंवा सर्वांना बंधनकारक आहे, हे बघावे लागेल. देशात हा निर्णय लागू होणार असेल तर त्यातील छोट्या-छोट्या बाबींचा नीट विचारपूर्वक अभ्यास करावा लागेल. या निर्णयाची लगेचच अंमलबजावणी होईल, असे नाही; मात्र स्वेच्छेने देहविक्रय करणाऱ्या महिलांना मान्यता देण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे, असे म्हणता येईल.'' -  राजेश पुराणिक (पोलीस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग) 

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायWomenमहिलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय