शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

क्रौर्य नाही, आध्यात्मिक शौर्य : संभाजीमहाराज मोरे; श्रीपाल सबनीस यांच्या टीकेस प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 13:16 IST

सौजन्यांचे हिशेबनीस होण्यापेक्षा संतसाहित्य वाचून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, अशा कडव्या शब्दांत संभाजीमहाराज मोरे (देहूकर) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देसत्याला दंडवत घालत यादव यांनी संतसूर्य कादंबरी मागे घेतली : संभाजीमहाराज मोरेश्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, मोरे यांची टीका

पिंपरी : संतसाहित्याची विटंबना झाली, म्हणूनच लेखक आणि प्रकाशकांच्याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल करणारे आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. आनंद यादव यांना पायउतार करणारे आम्हीच वारकरी होतो. हे क्रौर्य नसून, संत साहित्याचे आध्यात्मिक शौर्य आहे. त्यामुळे सौजन्यांचे हिशेबनीस होण्यापेक्षा संतसाहित्य वाचून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, अशा कडव्या शब्दांत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे माजी प्रदेशाध्यक्ष, संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आणि संभाजीमहाराज मोरे (देहूकर) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात मोरे  म्हणाले, ‘‘संतसूर्य कादंबरीमुळे तुकोबारायांसारख्या संत साहित्यिकांची विटंबना झाली होती. त्याबाबत वारकऱ्यांनी निषेध व्यक्त केल्यानंतर क्रौर्य आणि औदार्य यांचा विचार न करता सत्याला दंडवत घालत यादव यांनी संतसूर्य कादंबरी मागे घेतली. हा वैचारिक पराभव यादव यांना मान्य होता. ते स्वत: अध्यक्षपदावरून पायउतार झाले. हे वारकऱ्यांचे क्रौर्य नसून संतसाहित्याचे आध्यात्मिक शौर्य आहे. परंतु, क्रौर्याच्या अतर्क्य उनाड गप्पा मारणाऱ्या सबनीसांनी संतसाहित्य वाचून चिंतन करावे.
उगाच वारकऱ्यांच्या आध्यात्मिक शौर्याला आव्हान देऊ नये.  ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे काठी देऊ माथा।।’ असे रोख-ठोक बोलणाऱ्या तुकोबारायांचे आध्यात्मिक शौर्य अभंगातून तपासून पाहावे. कारण तुकोबाराय म्हणतात, ‘‘मायबापाहून बहू मायावंत। करू घातपात शत्रुहूनि।।’’  

प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी ‘संतसूर्य’ कांदबरीतून संत तुकाराममहाराजांचे चारित्र्यहनन केल्याचे संत तुकाराममहाराजांच्या वंशजांनी उघडकीस आणल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वादळ निर्माण झाले होते. त्यामुळे यादव यांना कादंबरी मागे घ्यावी लागली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी यादव यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात कार्यक्रम झाला. त्या वेळी ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक डॉ. आनंद यादव : जीवन आणि साहित्यगौरव विषयावरील परिसंवादात माजी साहित्य संमेलनाध्यक्ष सबनीस यांनी संतसाहित्यामध्ये क्रौर्य आहे का? असे विधान करीत वारकऱ्यांवर टीका केली. त्याला तुकोबारायांचे वंशज असणाऱ्या मोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPuneपुणेsant tukaramसंत तुकाराम