शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

"केंद्रातलेच मंत्री ऐकत नसल्यास केंद्रानेच त्यांच्यावर कारवाई करणं आहे अपेक्षित" उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 2:30 PM

राज्य सरकार आणि उद्धव साहेबांवर टीका करणं एवढाच जनआशीर्वाद यात्रेचा होता उद्देश

ठळक मुद्देमंत्र्यांनी हि यात्रा राजकारणाचा भाग होऊ नये याचा विचार करायला पाहिजे होता

पुणे : महाराष्ट्रात चार भाजप नेत्यांची जनआशीर्वाद यात्रा चालू आहे. यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन होतानाचे चित्र आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे, त्यातच आता राज्याचे तंत्र आणि उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यात्रेतील मंत्र्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.  

 जन आशिर्वाद यात्रा ही जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी असली तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेनेवर टीका करणे एवढाच अजेंडा या यात्रेचा ठेवला गेला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये; असे केंद्र शासनाने सांगितले असले तरी केंद्रीय मंत्रीच केंद्र शासनाचे ऐकतं नसतील तर त्यांच्यावर केंद्र शासनानेचे कारवाई करून एक आदर्श घालून द्यावा, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका करत आहेत. याबाबत उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सामंत म्हणाले, पेट्रोल, डिसेल ,दर केव्हा कमी होणार ? गॅसचे दर कमी करून गृहिणींना केव्हा दिलासा मिळणार ? याची उत्तरे जन आशिर्वाद यात्रा काढणा-या केंद्रीय मंत्र्याकडून कोकणाला हवी आहेत. तसेच लाखो बेरोजगार तरूणांना रोजगार केव्हा मिळणार ? त्यांच्या बँक खात्यात 15 लाख केव्हा जमा होणार? याची त्यांना प्रतिक्षा आहे. या प्रश्नांची उत्तरे देवून जन आशिर्वाद घेतला तर ती यात्रा फलदायी ठरेल,असे मला वाटते.

मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यावर काय होते. हे संपूर्ण महाराष्ट्राने व टीका करणा-यांनी सुध्दा पाहिले आहे. तसेच ज्या प्रसंगासाठी टीका झाली त्या प्रसंगाला अनुसरून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. त्यावर सबंधित नेत्यांवर काय टीका करणार ? तसेच जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशासाठी, महाराष्ट्रासाठी काय करणार ? याची उत्तरे महाराष्ट्राच्या जनतेला हवी आहेत, असेही सामंत म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkonkanकोकणEducationशिक्षण