भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'एअर इंडिया' सध्या अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीला २२,००० कोटी रुपयांचा रेकॉर्डब्रेक तोटा झाला आहे. हा तोटा कंपनीच्या अंतर्गत अंदाजापेक्षाही कितीतरी पटीने जास्त असल्याने, एअर इंडियाने आता आपला मालक 'टाटा समूह' आणि भागीदार 'सिंगापूर एअरलाईन्स'कडे तातडीच्या निधीची मागणी केली आहे.
एअर इंडियाच्या या आर्थिक पडझडीमागे केवळ अंतर्गत व्यवस्थापनच नाही, तर अनेक बाह्य संकटे कारणीभूत ठरली आहेत. जूनमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात २४० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला, ज्याचा मोठा फटका कंपनीच्या प्रतिमेला आणि संचालनाला बसला. इराणमधील युद्ध आणि पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केल्यामुळे एअर इंडियाला युरोप आणि अमेरिकेसाठी लांबचे मार्ग निवडावे लागले. यामुळे इंधन खर्चात प्रचंड वाढ झाली.
नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये एअर इंडियाला सुरक्षेच्या बाबतीत सर्वात 'खराब' रँकिंग मिळाले आहे.
नेतृत्वाचे संकटकंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी या वर्षाच्या अखेरीस पद सोडण्याची घोषणा केली आहे. एकीकडे फ्लीट विस्तार आणि विस्तारा एअरलाईन्सच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच, सीईओंचे राजीनामा सत्र आणि आर्थिक संकटामुळे टाटा समूहासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
विस्ताराच्या विलीनीकरणामुळे वाढला दबावविस्तारा एअरलाईन्सचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रक्रियेमुळे आणि जुन्या विमानांचे नूतनीकरण, नवीन विमानांची खरेदी तसेच तंत्रज्ञानावरील खर्च यामुळे कंपनीवरील आर्थिक भार वाढला आहे. सिंगापूर एअरलाईन्सची विस्तारा मध्ये २५.१% भागीदारी असून, विलीनीकरणानंतरही ते एअर इंडियामध्ये गुंतवणूक कायम ठेवणार आहेत.
टाटा समूहाचा 'व्हिस्टा' प्लॅनएअर इंडियाला जागतिक स्तरावर अव्वल स्थानी नेण्यासाठी टाटा समूहाने 'व्हियान.एआय' हा पंचवार्षिक रोडमॅप तयार केला आहे. या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणुकीची गरज आहे. नवीन इंजिन आणि तांत्रिक सुधारणांसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे, जेणेकरून कंपनीला पुन्हा नफ्यात आणता येईल.
Web Summary : Air India faces a record loss of ₹22,000 crore, exacerbated by accidents, rising fuel costs, and leadership changes. The airline seeks emergency funding from Tata Group and Singapore Airlines amid Vistara's merger and fleet expansion challenges.
Web Summary : एयर इंडिया को ₹22,000 करोड़ का रिकॉर्ड नुकसान हुआ है, जो दुर्घटनाओं, बढ़ते ईंधन खर्च और नेतृत्व परिवर्तन से बढ़ गया है। एयरलाइन विस्तारा के विलय और बेड़े के विस्तार की चुनौतियों के बीच टाटा समूह और सिंगापुर एयरलाइंस से आपातकालीन धन की मांग कर रही है।