शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राज्याला पावसाचा मोठा फटका; ७६ जणांचा मृत्यू तर ५९ जण बेपत्ता; ९० हजार लोकांचं स्थलांतर : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 3:16 PM

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही या पावसाचा मोठा फटका आहे.

पुणे : राज्यात जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी दरड कोसळत आहेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला ही वस्तुस्थिती आहे. तसेच नऊ जिल्हे पूरबाधित आहे. या दरम्यान ७६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही ५९ लोकं बेपत्ता आहेत. तसेच जखमींचा आकडा ३८ वर असल्याची माहिती आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही या पावसाचा मोठा फटका आहे. ही पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्यामागे जागतिक तापमानवाढीचा फटका असल्याचे हवामान तज्ञांचे मत आहे. 

पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात जोरदार पाऊस सुरु असून काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान ९० हजार लोकांना स्थलांतरित केले आहे. सध्या राज्यात एनडीआरएफचे २१ पथक कार्यरत आहे. लष्कर आणि नौदलाची इतर १४ पथके देखील आहे. एनडीआरएफच्या ४८ आणि इतर अशा एकूण ५९ बोटी मदतीला असुंन त्यांच्या मार्फत मदतकार्य सुरु आहे.तसेच पूरग्रस्तांच्या कुटुंबांना तांदूळ, डाळ आणि रॉकेल देणार तसेच काही ठिकाणी शिवभोजन थाळीही सुरू करणार आहे. सगळ्या पालकमंत्र्यांना आपापल्या भागात थांबण्यास सांगितले आहे. त्या ठिकाणावरून मुख्यमंत्र्यांना व आम्हाला देत आहेत. धरणाच्या खोलीकरणाचा आणि आताच्या पूरस्थितीचा काहीही संबंध नाही. सगळीकडेच पाऊस जास्त झाला, त्यामुळे काहीच करता येत नाही अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली. 

गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. वाई तालुक्यात कोंडविडे, मौजेघर, महाड येथील तळीये, पोलादपूरमध्ये साखर, सुतारवाडी आणि केवनाळे आणि पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबर्ली आणि ढोकवळी यासारख्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच घाटातही दरडी कोसळल्या असून घाट बंद करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील २३ दरडप्रवण गावांचे स्थलांतर करणार

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दरडप्रवण गावांच्या यादीत पुणे जिल्ह्यातील २३ गावांचा समावेश आहे. या गावांचे दुसरीकडे स्थलांतर करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

तळीये गाव दरडप्रवण क्षेत्रात येत नाही 

दरवर्षी दरडप्रवण क्षेत्र गावांची माहिती घेतली जाते, त्या गावातील नागरिकांना धोक्याच्या अगोदर स्थलांतरित केले जाते. मात्र रायगडमधील तळीये गाव हे दरडप्रवण क्षेत्रात येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.-----आमचे दुसरीकडे स्थलांतर करा

आमचे दुसरीकडे स्थलांतर करा, अशी मागणी या गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. दोन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि घडलेल्या घटनांमुळे हे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे नागरिक स्थलांतराची मागणी करत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारfloodपूरRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार