शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

केंजळ गाव होणार पहिले सौरग्राम!

By admin | Updated: August 29, 2016 03:24 IST

‘आमचा गाव-आमचा विकास’ योजनेअंतर्गत केंजळ येथे आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी संपूर्ण गावच सौरग्राम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच अविनाश जाधव यांनी सांगितले.

भोर : ‘आमचा गाव-आमचा विकास’ योजनेअंतर्गत केंजळ येथे आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी संपूर्ण गावच सौरग्राम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच अविनाश जाधव यांनी सांगितले.केंजळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत वीज वितरण कंपनीची वीज न वापरता सौरऊर्जेवर निर्माण होणारी वीज वापरली जाते. त्यासाठी नेट मीटरची परवानगी मिळाली आहे. यापुढे ग्रामपंचायत कार्यालय, गावातील स्ट्रीट लाइट व गावातील पाणीपुरवठा करणारे पंपसेट यांच्यासाठीदेखील सौरऊर्जा वापरली जाणार आहे. त्यासाठी गावातील सार्वजनिक ऊर्जेस पर्याय म्हणून सौर पॉवर प्लान्ट उभारण्यात येणार आहे. दिवसा सौरऊर्जा निर्माण करून नेट मीटरद्वारे एमएसइबीला देऊन त्याबदल्यात रात्री स्ट्रीट लाइटसाठी विजेचा वापर केला जाणार आहे. या कामासाठी जिल्हा परिषद निधी अथवा जिल्हा परिषदेकडून कर्ज घेतले जाणार असून केंजळ हे तालुक्यातील पहिले सौरग्राम होणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी सांगितले.या वेळी ग्रामसभेत गावातील ११ ग्रामस्थांनी वैयक्तिक आपल्या घरांवर सौर पॉवर पॅक बसविण्याची तयारी दर्शवली आहे. लोकांच्या मागणीनुसार भविष्यात कौलारू घरांवरही कमी वजनाचे सौर पॉवर पॅक बसवले जाणार असल्याचे ग्रामसेवक एम. व्ही. लेंडवे यांनी सांगितले. (वार्ताहर)