शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही शेततळी वरदान

By admin | Updated: August 6, 2015 03:38 IST

सध्याच्या दुष्काळसदृश स्थितीत फळबागांना जगविणारी, आठमाही पाणी परवानाधारकांना बागायतदाराचा दर्जा देणारी, वैयक्तिक व सामुदायिक शेततळी म्हणजे

शैलेश काटे, इंदापूर सध्याच्या दुष्काळसदृश स्थितीत फळबागांना जगविणारी, आठमाही पाणी परवानाधारकांना बागायतदाराचा दर्जा देणारी, वैयक्तिक व सामुदायिक शेततळी म्हणजे शेतकऱ्यांच्या भरवशाच्या पाण्याच्या बँका ठरलेल्या आहेत. त्यामुळे दुष्काळात शेततळी वरदानच ठरली आहेत.सन २००३-०४ च्या सुमारास ही शेततळ्यांची योजना सुरू झाली. पुढच्या दोन-तीन वर्षांत तिने गती घेतली. प्रथमत: पुरेशा गांभीर्याने न घेतलेल्या या योजनेचे महत्त्व त्या दशकात सतत दुष्काळ अनुभवणाऱ्या इंदापूरकरांना चांगलेच पटले. आजघडीला सन २०१२-१३, सन २०१३-१४ या कालावधीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून १९४ सामुदायिक शेततळी झाली आहेत. ४ कोटी ९० लाख १ हजार ७४ रुपयांचे अनुदान मिळाले आहे. ८ लाख ३१ हजार ५०० घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सन २०१३-१४ या वर्षात १३६ लाभार्थ्यांना २ कोटी ६९ लाख ७७ हजार ७७४ रुपये अनुदान मिळाले. निर्माण झालेल्या शेततळ्यांमध्ये ४ लाख ५५ हजार घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.पावसाचा लहरीपणा, भूगर्भातील पाणीपातळीत होणारी घट, वातावरणातील बदलांमुळे तापमानात होणारी वाढ, वीज भारनियमनाचे संकट यातून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्च ते जूनदरम्यान पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असे. भीमा, नीरा नद्यांच्या किनारी शेतकऱ्यांनी उचलपाणी परवानगी घेऊन अथवा विनापरवाना उपसा सिंचन योजना राबवल्या. त्यामुळे त्यांना उन्हाळा तितकासा जाचत नसे. नीरा कालव्यावरील बारमाही पाणी परवानाधारकांनाही उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत नसे. मात्र, तालुक्यातील निमगाव केतकी पट्टयातील २२ गावे, खडकवासला कालव्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहावे लागत असे.आठमाही पाणी परवानाधारकांना मार्च ते जून या कालावधीत शेतीला शाश्वत पाण्याची सोय करण्यासाठी शेततळ्याच्या योजनेचा पर्याय पुढे आला. दुष्काळात त्याची उपयुक्तता जाणवली. शेततळ्याची सुरुवात तालुक्यातील बोरी गावापासून झाली. तेथील द्राक्ष व डाळिंबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डाळिंब व द्राक्षासारख्या पिकांना गरजेप्रमाणे पाणी व्यवस्थापन करणे शेततळ्यांमुळे सोयीस्कर होऊ लागले. बघता बघता शेततळे घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली.चालू वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे जून महिन्यामध्ये फळझाडांची पाण्याची गरज शेततळ्यांनीच भागवली आहे. इंदापूर तालुक्यातील फळबागा मध्यम ते हलक्या प्रतीच्या जमिनीवर बहरलेल्या आहेत. ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी फळबागांचे व्यवस्थापन करीत आहेत. शेततळ्यातील पाण्याचा गरजेएवढाच वापर करण्यात येत असल्याने द्राक्ष व डाळिंब बागा योग्य प्रकारे जोपासल्या गेल्या आहेत. काळ्या रंगाच्या द्राक्षाच्या निर्यातीमध्ये इंदापूर तालुका अग्रेसर राहील. त्यामध्ये शेततळ्याचे मोठे योगदान आहे.