शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

CoronaVirus: आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट; १४ एप्रिलनंतर होणार अंतिम निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 12:54 AM

राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने सामाजिक, राजकीय, धार्मिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी कार्यक्रम घेण्यास मज्जाव केला आहे. 

- भानुदास पऱ्हाडशेलपिंपळगाव : पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरी।। या उक्तीप्रमाणे दरवर्षी प्रत्येक वारकरी माऊली आणि तुकोबांच्या पायीवारी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतात. मात्र चालू वर्षी देशावर कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून "लॉकडाऊन" प्रक्रिया अवलंबविण्यात आली असून, राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने सामाजिक, राजकीय, धार्मिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी कार्यक्रम घेण्यास मज्जाव केला आहे. रविवारी (दि.४) कोरोनासंदर्भात उपाययोजनांबद्दल अधिक माहिती देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, यापुढे कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक, विविध धर्मांचे सोहळे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही. तसेच पंढरपूर येथील चैत्र वारी रद्द करण्यात आली असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळा रद्द झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी (पोर्टल) प्रसिद्ध केले. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये पालखी सोहळ्याबाबत उलट - सुलट चर्चांना उधाण आले आहे. या अनुषंगाने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोरोना संसर्गजन्य रोग प्रादुर्भावामुळे आषाढी पायीवारी सोहळा होणार किंवा नाही? याबाबत नक्कीच संदिग्धता आहे. पंढरपूर येथे आषाढी वारीपूर्वी संस्थान कमिटी, फडकरी, मालक तसेच संबंधित अन्य घटकांची होणारी महत्त्वपूर्ण बैठक यावर्षी कोरोना व 'लॉकडाऊन'मुळे अद्याप झाली नाही. त्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे. 

१४ एप्रिलला 'लॉकडाऊन' संपल्यानंतर आषाढी पायीवारी सोहळ्यासंदर्भात राज्यशासन, सोहळा मालक, फडकरी, दिंडी चालक - मालक, शितोळे सरकार आदींशी ज्ञानेश्वर महाराज संस्थांन कमिटीचे सर्व ट्रस्टी संपर्क साधून चर्चा करणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या आदेशानंतर वारी संदर्भातचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे ढगे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस