शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निर्बंधांच्या वेळेबाबत शब्द फिरवला; पुणेकरांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 10:55 IST

पुणे : महापालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीत पुण्यात सायंकाळी सहापर्यंतच दुकाने उघडी राहणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंच्या ...

पुणे : महापालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीत पुण्यात सायंकाळी सहापर्यंतच दुकाने उघडी राहणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ आठ वाजेपर्यंत असताना पुण्यात सहा वाजेपर्यंतच का केली? असा सवाल कला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत राज्याप्रमाणेच पुण्यातही नियम असतील, असे म्हटले होते. त्यांनी आपला शब्द फिरवल्याची टीका होत आहे.

खासदार गिरीश बापट म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामध्ये राज्यात ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी आहे. मात्र, पुणे शहरात मात्र ही मर्यादा सायंकाळी ६ वाजेपर्यंत केली गेली आहे़ हा निर्णय अयोग्य असून, राज्याप्रमाणेच पुण्यातही रात्री आठपर्यंतची मर्यादा असावी़

कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी संपूर्ण राज्यात एकच निर्णय लागू राहिल, असे सांगितले होते़ मात्र तसे न होता पुण्याला पूर्वीप्रमाणेच निर्बंध लावण्यात आले आहेत़ सायंकाळी सहा वाजता आस्थापना, कंपन्या बंद झाल्यावर तेथील कामगारांना घरी जाण्यासाठी तास दीड तास तरी वेळ लागतो. त्यातच पुण्यातील बससेवाही बंद आहे़ त्यामुळे या निर्णयाबाबत पुनर्विचार होणे आवश्यक असल्याचेही खासदार बापट यांनी सांगितले.

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जाहीर करतानाच, स्थानिक प्रशासनाने त्या त्या ठिकाणची परिस्थितीनुसार त्यात बदल करावा असेही स्पष्ट केलेले आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधितांची वाढ ही इतर शहरांच्या तुलनेत अधिक असल्याने, पुणे महापालिकेने यापूर्वीच शहरातील दुकाने सायंकाळी सहा वाजता बंद करून संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने जाहीर केलेली नियमावली योग्य असल्याचे मत शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी व्यक्त केले.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुण्याची नियमावली राज्याची नियमावली लागू होण्यापूर्वीच जाहीर करण्यात आली असून, ती अंमलबात आणली जात आहे़ निर्बंध पाळणे हे महत्त्वाचे असून सायंकाळी सहा की रात्री आठ हा विषय महत्त्वाचा नाही.कोरोना रूग्णसंख्या वाढत असून, आज रूग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपण कोरोना संसर्ग रोखणे हे जरूरी आहे, असे मत काँग्रेस महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार