शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

'शरद पवारांमुळे राजकारणाचा विचका', राज ठाकरेंचं म्हणणं मान्य आहे का? नितीन गडकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:55 IST

Nitin Gadkari Raj Thackeray Sharad Pawar: महाराष्ट्रातील राजकारणाचा विचका झाला, त्याला शरद पवार कारणीभूत असल्याचे विधान राज ठाकरेंनी केले. याबद्दल नितीन गडकरींनी त्यांची भूमिका मांडली. 

Nitin Gadkari on Sharad pawar: महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला आहे. या सगळ्याला शरद पवार जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने करत आहेत. याबद्दल एका मुलाखतीत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एका नेत्यामुळे विचका झाला, असं म्हणणं अन्यायकारक आहे, अशी भूमिका नितीन गडकरींनी मांडली. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीला नितीन गडकरींनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं, भूमिका मांडली. 'महाराष्ट्रात राजकारणाचा विचका झालाय आणि याला कारणीभूत शरद पवार आहेत, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आपल्याला हे मान्य आहे का?' असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला होता. 

राज ठाकरेंच्या विधानावर नितीन गडकरींनी काय मांडली भूमिका?

या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले, "असं आहे की, राजकारणाचा विचका झालाय, हे मला मान्य आहे. पण, मी जसं सांगितलं की, कुण्या नेत्यामुळे विचका झाला हे म्हणणं अन्यायकारक आहे. कारण शेवटी कोणी काही सांगत असलं, तरी न्यायाधीश कोण आहे? मालक कोण आहे? जनता आहे."

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, "जनतेची जर दिशाभूल होत असेल, ती जर चुकीच्या मार्गावर जात असेल, तर समाजाला बदलवण्याची जबाबदारी आमची आहे."

लोकांना म्हणालो, "मी कमी पडलो"

याच मुद्द्यावर बोलताना नितीन गडकरींनी लोकसभा निवडणुकीचेही उदाहरण दिले. "मी नागपूरच्या सभेत बोललो. उत्तर नागपूरमध्ये मी ३२ हजारांनी मागे आहे. सगळ्या मतदारसंघात भरपूर मताधिक्य आहे, उत्तर नागपूरमध्ये मागे आहे. दलित बहुसंख्य मतदार आहेत तिकडे. मी त्यांना म्हटलं की, मी मागे आहे. पण, मी मागे आहे, याचा अर्थ माझं काम कमी पडलं. माझी सेवा कमी पडली. तुमचा विश्वास संपादन करण्यात मी कमी पडलो. मी स्वतःला दुरुस्त करेन आणि अजून जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन", असे मत गडकरींनी मांडले.

मी ज्या माणसाचा हात पकडतो, तो खड्ड्यात गेला तरी सोडत नाही -नितीन गडकरी  

"नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाहीये. हे शेवटी समाजामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून आणि राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. आणि राजकारण बदललं की, मी मित्र बदलत नाही. मी ज्या माणसाचा हात पकडतो, तो खड्ड्यात गेला तरी सोडत नाही. मी नेहमी राजकारणात मैत्री वेगळी ठेवली आणि राजकारण वेगळं ठेवलं", असे उत्तर नितीन गडकरींनी या प्रश्नाला दिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवार