शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: “...तर उत्पल पर्रिकरांविरोधात अन्य पक्षांनी उमेदवार देऊ नये”; संजय राऊतांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 12:01 IST

Goa Election 2022: मनोहर पर्रिकर यांना तीच खरी श्रद्धांजली असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकांच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आताच्या घडीला भाजपमधून बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अन्य सर्व पक्षांना आवाहन करत उत्पल पर्रिकर यांच्याविरोधात उमेदवार देऊ नयेत, असे म्हटले आहे. 

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपकडे तिकिटासाठी दावा केला आहे. भाजपने त्यांना तिकीट न देण्याचे संकेत दिले असले तरी, त्यांना तिकीट नाकारणेही महागात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसमोर त्रांगडे निर्माण झाले आहे. तसेच भाजपने उमेदवारी नाकारल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी उत्पल पर्रिकर यांनी केल्यामुळे भाजपसमोरील पेच वाढल्याचे सांगितले जात आहे. अशातच संजय राऊत यांनी सर्वपक्षीयांना आवाहन केले आहे. 

उत्पल पर्रिकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे

मनोहर पर्रिकर हे गोव्याचे प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचे नक्कीच योगदान होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाशी भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे अपमान केला आहे, हे कोणाच्या मनाला पटलेले नाही. पर्रिकरांच्या कुटुंबाविषयी तुम्ही अशा प्रकारे बोलताय तर तुमची लायकी काय, अशी विचारणा करत, उत्पल पर्रिकर जर अपक्ष लढणार असतील, तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे. आप, काँग्रेस, तृणमूल आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी उत्पल पर्रिकरांविरोधात उमेदवार देऊ नये, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. 

भाजपला उमेदवारी द्यावीच लागेल

भाजपला उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी द्यावीच लागेल, याची मला खात्री आहे. आमचा दबाव आहे. आम्ही सगळे त्यांच्या पाठी उभे राहिलो म्हणून भाजपला उमेदवारी द्यावीच लागणार आहे. मनोहर पर्रिकर यांना तीच खरी श्रद्धांजली असेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, महाराष्ट्रातील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना, वैफल्य आहे. निराशा आहे. त्यातून अशा प्रकारची भाषा वापरली जात आहे. अटलींचे संस्कार ते विसरले आहेत, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना