शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पाच वर्षात गणेश नाईकांनी राष्ट्रवादी खड्यात घातली, जितेंद्र आव्हाड झाले भाऊक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 2:22 PM

राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय  सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. पाच वर्षात नाईक यांनी पक्षाची वाट लावली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देपाच वर्षापूर्वीच नाईकांना पक्ष सोडायचा होतापक्षाने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही

ठाणे - गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार हे २०१४ मध्येच ठरले होते. या संदर्भात मी वारंवार पक्षाला सांगत होतो, मात्र पक्षाने नेहमी नाईकांना वरची बाजू दिली. परंतु मागील पाच वर्षात नाईकांनी राष्ट्रवादी संपवली असा आणि आज पक्ष अडचणीत असतांना पक्षाला उभारी देण्याऐवजी ते आपला स्वार्थ साधण्याचे काम करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय  सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही पक्ष उभा करु आणि त्याची सुरवात नवी मुंबईतूनच करु असा विश्वास व्यक्त करीत आव्हाड भाऊक झाले.मागील काही दिवसापासून नाईक कुटुंब हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरु होती. त्यानंतर मंगळवारी संदीप नाईक यांनी आपला राजीनामा दिला आणि सुरु असलेल्या या चर्चांना पूर्णविराम लागला. यावर मात्र आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली असून नाईकांच्या या निर्णयाविरोधात ते भाऊक झाल्याचे दिसून आले. गणेश नाईक यांनी पध्दतशीरपणे राष्ट्रवादी संपवली असल्याचा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात मी वारंवार पक्षाला याची माहिती देत होतो, मात्र माझे दुर्देव असे की माझ्यावर किंवा माझ्या बोलण्यावर पक्षाने सुध्दा विश्वास ठेवला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उलट नाईक यांना नेहमी वरची बाजू पक्षाने दिल्याचेही त्यांनी सांगितले. २०१४ मध्येच नाईक हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु होती. परंतु साहेबांनी नाईक हे आपले बंधुतुल्य सहकारी असल्याचे सांगत ते कधीही गद्दारी करणार नाहीत, असे सांगत होते. मागील पाच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला खड्यात घालण्याचे काम केले. कल्याण डोंबिवलीत सत्ता असतांना आज त्याठिकाणी एकही नगरसेवक नाही, हीच परिस्थिती भिवंडी आणि मिराभाईंदरमध्येही होती. या सर्वांचे नेतृत्व कोण करीत होते, तर ते नाईकच होते. घरी बसून पक्ष चालत नाही, हे त्यांना समजायला हवे होते. मात्र राष्ट्रवादीला संपविण्याचा विडाच त्यांनी उचलला होता असा आरोपही त्यांनी केला.स्वाभीमानाच्या गप्पा मारणाऱ्या गणेश नाईक यांच्या विरोधात मंदा म्हात्रे वाट्टेल ते बोलत आहेत. भाजपचे अध्यक्ष नाईक यांना आम्ही स्विकारणा नाही असे बोलत आहेत. असे असतांनाही आता कुठे गेला नाईकांचा स्वाभीमान असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीने नाईक कुटुंबाला अख्खी नवी मुंबई दिली होती. सर्व महत्वाची पदे त्यांच्या घरात होती, असे असतांनाही त्यांनी गद्दारी केली. नवी मुंबईचा विकास झाला हे मान्य जरी केले तरी त्यात नाईकांनी आपल्या घराच्यांचाच विकास अधिक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मला हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत होते. मात्र पक्षाकडूनच याची दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केले. मात्र आता हा पक्ष पुन्हा एकदा उभा करु आणि त्याची सुरवात नवीमुंबईतूनच करु असा विश्वास आव्हाडांनी शेवटी बोलतांना व्यक्त केला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड