शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

भगवा गुंडाळून ठेवल्यानेच ठाण्याला तोकडी मदत, अतुल भातखळकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 7:05 PM

Atul Bhatkhalkar : ठाणे महापालिकेसह इतर महापालिकांवर देखील भाजपाचा झेंडा फडकेल असा दावा अतुल भातखळकरांनी केला.

ठळक मुद्देमदत ही शासनाची ती वाटतांना ती स्वत:च्या नावावर वाटण्यात आली. त्यातही ५० टक्केच मदत सुद्धा जनतेपर्यंत पोहोचलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे  : कोव्हिडच्या काळात ठाणे  महापालिकेला फक्त ६८ कोटी राज्य शासनाने दिले. ज्या महापालिकोवर सर्वात पहिला मुंबईच्याही आधी शिवसेनेचा झेंडा फडकला. त्या ठाणे महापालिकेला कोव्हिडच्या काळात मोठी मदत राज्य सरकारकडून केली जाईल, अशी आशा होती. परंतु भगवाच गुंडाळून ठेवल्याने ठाणे महापालिकेच्या वाटेला देखील सावत्र भावाची वागणूक आली असल्याची टिका भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

ठाण्यात महाविकास आघाडीच्या वर्षपुर्ती निमित्ताने विविध विषयांवर झालेल्या बिघाडीच्या विषयी ते बोलत होते. कोव्हिडच्या काळात ठाणे महापालिकेला अतिशय छोटी रक्कम मिळाली. २०११ च्या जागतिक लोकसंख्येचा विचार केला तर ठाणे शहराच्या लोकसंख्येला, त्यानुसार कोव्हिडच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मागे राज्य सरकाराने ६०० रुपये सुद्धा खर्च करण्याचे औदार्य दाखविले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 

कोव्हिडच्या काळात राज्य शासनाकडून मदत मिळावी या हेतून ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे २५० कोटींची मदत मागितली होती. परंतु आता राज्यशासनाने ठाण्याच्या तोंडाला या अशा परिस्थितीतही पाने पुसण्याचाच प्रकार केल्याची टीका त्यांनी केली. अतिशय वाईट अवस्था राज्य शासनाने ठाणे महापालिकेची करुन ठेवली आहे. त्यातही कोव्हिडच्या काळात फक्त राज्य सरकार आणि महापालिकेने जे काही धान्य दिले. ते धान्य मात्र आपआपल्या भागामध्ये स्वत:चा फोटो लावून स्वत:च्या पक्षाचे चिन्ह लावून, ते वाटण्याचा कार्यक्रम याच मंडळींनी ठाण्यात केला आहे.

आयजीच्या जीवावर बायजी उधार तसाच काहीसा हा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली. परंतु या सर्व प्रकरणात देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. मदत ही शासनाची ती वाटतांना ती स्वत:च्या नावावर वाटण्यात आली. त्यातही ५० टक्केच मदत सुद्धा जनतेपर्यंत पोहोचलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करावी ही मागणी त्यांनी यावेळी केली. 

मुंबईत कोरोना आल्यानंतर तेथील परिस्थिती हातळताना कशा प्रकारे सामना करावा लागला याची जाण राज्यशासनाला होती. परंतु एवढे असतांनाही ठाणे  आणि एमएमआर रिझनमध्ये कोव्हिडची परिस्थिती हातळण्यास त्यांना जमले नाही. मुंबईत ज्या पद्धतीने कोव्हिडच्या काळात अॅम्ब्युलेन्स न मिळणे, मृतदेहांची आदलाबदल होणे, वेळवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यु असे प्रकार घडले. तेच प्रकार पार्ट टू मध्ये ठाणे आणि एमएमआर रिझनमध्येही घडल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणारठाणे महापालिकेचा कारभारही सध्या चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. त्यांच्या अनेक चुका भाजपाने दाखवून दिलेल्या आहेत. कोव्हिडच्या काळात महापालिकेत आयुक्त दोन दोनदा बदलणे, मदतीचा आभाव, दोन मंत्र्यांच्या अलौकीक कथा चर्चील्या जात आहेत. नागरी सोई सुविधा कमी पडलेल्या आहेत. त्यामुळे ठाण्यात किंवा कल्याण डोंबिवली महापालिका, नवी मुंबई महापालिका असो कुठेही आम्ही कमी पडणार नसून भाजपा या सर्वच ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. तसेच ठाणे महापालिकेसह इतर महापालिकांवर देखील भाजपाचा झेंडा फडकेल असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाShiv Nadarशिव नाडरUddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणे