आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
1 / 7शहरांमधील वाढत्या जागेच्या टंचाईमुळे सध्या २०, ३० किंवा अगदी ५० मजली इमारतींचे पेव फुटले आहे. बिल्डर्सकडून 'आकाशाला गवसणी घालणारे घर' अशा जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित केले जाते. पण, प्रत्यक्षात राहण्यासाठी गेल्यावर या 'उंच' स्वप्नांचे रूपांतर 'मोठ्या' त्रासात होऊ शकते. गाझियाबादमधील 'वेवसिटी'मध्ये राहणारे शिक्षक राहुल गौतम यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे, ज्यामध्ये त्यांना सहकुटुंब १३ मजले पायऱ्यांनी चढावे लागले.2 / 7राहुल गौतम यांच्या बिल्डिंगमध्ये सकाळी १० वाजल्यापासून वीज गायब होती. संध्याकाळी ४ वाजेपर्यंतही वीज न आल्याने लिफ्ट बंद होती. अशा परिस्थितीत राहुल यांना त्यांची पत्नी, मुले आणि हातातील जड बॅगा घेऊन १३ व्या मजल्यावरील आपल्या घरापर्यंत पायऱ्यांनी चढावे लागले. व्हिडिओमध्ये राहुल सांगतात, 'खिडकीतून बाहेरचे सुंदर नजारे दिसतील म्हणून इतक्या उंचीवर घर घेतले होते, पण लिफ्ट नसेल तर काय हाल होतात, याचा विचार केला नव्हता.' वर्षातून असे दोन-तीन दिवस कसरतीचे असतातच, अशी मिश्किल पण हतबल टिप्पणीही त्यांनी केली.3 / 7उंच इमारती पूर्णपणे लिफ्टवर अवलंबून असतात. तांत्रिक बिघाड किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यास (विशेषतः जनरेटर बॅकअप नसल्यास) रहिवाशांचे हाल होतात. अशा वेळी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरू शकतो.4 / 7हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये अग्निशमन दलाकडे ७०-८० मीटरपेक्षा जास्त उंचीवर पोहोचणाऱ्या शिड्या उपलब्ध नाहीत. जर २० व्या किंवा ३० व्या मजल्याच्या वर आग लागली, तर बचावकार्य करणे अत्यंत कठीण होते. अशा वेळी रहिवाशांना केवळ इमारतीच्या अंतर्गत अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते, जी अनेकदा नादुरुस्त असते.5 / 7तज्ज्ञांच्या मते, अति उंचीवर राहणाऱ्या काही लोकांना 'High Altitude' मुळे येणारे नैराश्य किंवा अस्वस्थता जाणवू शकते. तसेच, लिफ्टवर अवलंबून राहिल्याने शारीरिक हालचाली कमी होतात. काही संशोधनांनुसार, जमिनीपासून जास्त उंचीवर राहणाऱ्या लोकांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय मदत (उदा. हार्ट अटॅकच्या वेळी पॅरामेडिक्स) पोहोचण्यास विलंब झाल्याने जीवितहानीचा धोका वाढतो.6 / 7हाय-राईज इमारतींमध्ये लिफ्ट, पाण्याचे पंप, फायर फायटिंग सिस्टीम आणि चोवीस तास सुरक्षा यांसाठी मोठ्या प्रमाणात वीज आणि मनुष्यबळ लागते. यामुळे अशा सोसायट्यांचे 'मेंटनन्स' सामान्य इमारतींच्या तुलनेत दुपटीने किंवा तिपटीने जास्त असते, जो तुमच्या खिशाला कायमचा फटका बसवतो.7 / 7भूकंप किंवा वादळासारख्या परिस्थितीत उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण जास्त असते. जोराच्या वाऱ्यामुळे वरच्या मजल्यांवर होणारी कंपने अनेकांना अस्वस्थ करतात. तसेच, आपत्कालीन वेळी इमारत रिकामी करताना पायऱ्यांचा वापर करावा लागत असल्याने चेंगराचेंगरीची शक्यता वाढते.