भारताने बंगालच्या उपसागरात एक मोठा 'नोटीस टू एअरमेन' (NOTAM) जारी केला असून, सुमारे ३,५५० किलोमीटरचा परिसर 'डेंजर झोन' म्हणून घोषित केला आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आपली शक्तीशाली इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाइल 'अग्नी-IV' च्या चाचणीची तयारी करत आहे. या चाचणीसाठी निवडण्यात आलेली वेळ अतिशय महत्त्वाची मानली जात असून, हा एक मोठा आंतरराष्ट्रीय संदेश असल्याचे बोलले जात आहे.
ही चाचणी २५ एप्रिल २०२६ ते ६ मे २०२६ या कालावधीत होऊ शकते. विशेष म्हणजे, मे २०२५ मध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत मोठे हल्ले केले होते. या धाडसी कारवाईला एक वर्ष पूर्ण होत असतानाच भारत ही क्षेपणास्त्र चाचणी करत आहे. सहा मे रोजीच ही चाचणी होण्याची शक्यता आहे.
अग्नी-IV: भारताचे अजेय अस्त्र
पल्ला: ३,५०० ते ४,००० किलोमीटरपर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता.
क्षमता: १० हजार किलोपर्यंतचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम.
अचूकता: आधुनिक एव्हिऑनिक्समुळे याची 'सर्कुलर एरर' १०० मीटरपेक्षाही कमी आहे, म्हणजेच हे क्षेपणास्त्र अत्यंत अचूक आहे.
बनावट: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेले हे दोन टप्प्यांचे, घन इंधनावर आधारित क्षेपणास्त्र आहे.
तैनाती: हे क्षेपणास्त्र रस्त्यावरूनही कुठेही नेऊन डागता येते, ज्यामुळे युद्धकाळात याची उपयुक्तता वाढते.
NOTAM म्हणजे काय?'नोटीस टू एअरमेन' तेव्हा जारी केला जातो जेव्हा एखाद्या विशिष्ट हवाई क्षेत्रातील नागरी विमानांची वाहतूक थांबवायची असते. क्षेपणास्त्र चाचणी किंवा युद्धाभ्यास करताना सुरक्षा उपाय म्हणून हे क्षेत्र बंद केले जाते. सध्या भारत आणि पाकिस्तान दोघांनीही गेल्या एक वर्षापासून एकमेकांसाठी हवाई क्षेत्र मर्यादित केले आहे.
संरक्षण सज्जतेचा नवा टप्पाभारत केवळ अग्नी-IV नव्हे, तर ८०० किमी पल्ल्याच्या ब्रह्मोस क्रूझ मिसाइल आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रांवरही काम करत आहे. या चाचण्या भारताच्या 'किमान विश्वसनीय प्रतिबंधक' धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
Web Summary : India declared a 'danger zone' in the Bay of Bengal, hinting at an Agni-IV missile test. This action, coinciding with the anniversary of strikes on terror camps in Pakistan, signals India's strengthened defense readiness and strategic messaging capabilities.
Web Summary : भारत ने बंगाल की खाड़ी में 'डेंजर जोन' घोषित किया, अग्नि-IV मिसाइल परीक्षण का संकेत। पाकिस्तान में आतंकी शिविरों पर हमलों की वर्षगांठ के साथ, यह भारत की रक्षा तैयारी और रणनीतिक संदेश क्षमताओं को मजबूत करता है।