शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:४३६ कि.मी.च्या जलवाहिनीचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:29 IST

बहुप्रतिक्षीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत परभणी शहरात सुमारे ४३६ किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, जलशुद्धीकरण केंद्रांपासून ते जलकुंभांपर्यंत जलवाहिनी जोडणे, व्हॉल्व्ह टाकणे ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात शहरवासियांना नव्या योजनेतून पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची परभणीकरांची पाणी समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बहुप्रतिक्षीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत परभणी शहरात सुमारे ४३६ किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, जलशुद्धीकरण केंद्रांपासून ते जलकुंभांपर्यंत जलवाहिनी जोडणे, व्हॉल्व्ह टाकणे ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात शहरवासियांना नव्या योजनेतून पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची परभणीकरांची पाणी समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे.परभणी शहराची पाण्याची समस्या दूर व्हावी, या उद्देशाने २००८ मध्ये युआयडीएसएसएमटी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. सध्या शहराला पाणीपुरवठा करणारी राहाटी येथील पाणीपुरवठा योजनचा ३० वर्षांपूर्वीची आहे. या काळात शहराची लोकसंख्या दुपटीने वाढली. त्यामुळे राहाटीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरवासियांना वेळेत आणि मुबलक पाणीपुरवठा होत नाही. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला पाणी वितरण करताना कसरती कराव्या लागत आहेत. सध्या शहराला १५ दिवसांना एक वेळा म्हणजे एका महिन्यात केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे राहाटीच्या बंधाऱ्यात मुबलक पाणी असतानाही परभणीकरांना मात्र कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरवासियांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दोन वर्षांपासून महापालिकेने नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती दिली आहे. २००८ पासून रखडलेली ही योजना आता अमृत योजनेत मिळालेल्या १०२ कोटी रुपयांच्या खर्चातून पूर्ण केली जात आहे. या योजनेचे दोन टप्पे करण्यात आले असून, त्यातील पहिला टप्पा येलदरी येथील उद्भव विहीर ते परभणी शहराजवळ उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे हा आहे. तो पूर्ण झाला आहे. दुसºया टप्प्यात शहरातील अंतर्गत जलवाहिनी टाकणे, जलकुंभ उभारणे, रायझींग लाईनपासून ते जलकुंभापर्यंत पाणीपुरवठा करणे, व्हाल्व्ह बसविणे आदी कामे केली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, आता दुसºया टप्प्यातील कामे अंतिम टप्प्यात आहेत.शहराच्या विविध भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सहा महिन्यांपासून सुरू आहे. अमृत योजनेअंतर्गत १७० किलोमीटर आणि यु.आय.डी.एस.एस.एम.टी. योजनेअंतर्गत २६६ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, काही भागात वाढीव जलवाहिनी टाकली जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेने जलवाहिनी टाकण्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू होते. ते आता पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीला जलवाहिनीला आवश्यक त्या ठिकाणी व्हॉल्व्ह बसविणे, पाण्याचे वितरण करण्यासाठी जलवाहिनीतून येणाºया पाण्याची चाचणी घेणे ही कामे शिल्लक आहेत. जलवाहिनी अंथरण्याचे काम जवळपास पूर्ण झाल्याने आता ही योजना दृष्टीक्षेपात आली असून, लवकरच योजनेअंतर्गत शहराला पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.अतिवृष्टी : कामांवर झाला परिणाम४येलदरीपासून ते धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र जिंतूर रस्त्याला महामार्गाचा दर्जा मिळाल्याने रस्त्याचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे आधी टाकलेली जलवाहिनी काढून ती रस्त्याच्या कडेने टाकण्याचे काम हाती घ्यावे लागले.४७ कि.मी. अंतराचे हे काम सुरू केल्यानंतर जिल्ह्यात परतीच्या पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे या कामात व्यत्यय निर्माण झाला होता. मात्र पाऊस थांबल्यानंतर हे कामही पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील जलवाहिनीच्या कामावरच महापालिकेने लक्ष केंद्रीत करुन ही कामे पूर्ण करुन घेतली आहेत.४शहरातील किरकोळ कामे बाकी असून, डिसेंबर महिन्यापर्यंत शिल्लक कामेही पूर्ण करण्याचे नियोजन मनपाने केले आहे.१५ जलकुंभांतून पाण्याचे वितरण४शहरातील सर्व विभागामध्ये समान पाण्याचे वितरण व्हावे, या उद्देशाने नवीन योजनेअंतर्गत मनपाने १५ जलकुंभाचे नियोजन केले आहे. त्यातील काही जलकुंभ अमृत योजनेअंतर्गत बांधले जात आहेत तर काही जलकुंभांचे काम यु.आय.डी. योजनेअंतर्गत यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे.४बहुतांश जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीला पार्वतीनगर येथील जलकुंभाचे काम स्लॅब लेव्हलपर्यंत आले असून, हे काम पूर्ण करुन घेण्याचे लक्ष्य मनपाने ठेवले आहे. पाणी साठवण्यासाठी जलकुंभ तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष जलवाहिनीतून जलकुंभापर्यंत पाणी आणण्याची चाचणी घेतली जाणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याला सुरुवात केली जाणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRainपाऊस