शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

शंभर एकरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

वालूर : सेलू तालुक्यातील वालूर व परिसरात १८ व १९ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे जवळपास ...

वालूर : सेलू तालुक्यातील वालूर व परिसरात १८ व १९ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे जवळपास १०० एकरवरील रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, भुईमूग, ऊस व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वालूर व परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा खर्च करीत कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिके घेतली. मात्र ही पिके काढणीस आल्यानंतर सप्टेंबर २०२० या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यानंतर खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. या पाणीसाठ्याचा उपयोग घेत खरीप हंगाामातील पिकांचे झालेले नुकसान रबी हंगामातील पिकांमधून काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. पारंपरिक ज्वारी पिकाकडे पाठ फिरवून शेतकऱ्यांनी यावर्षी हरभरा. भुईमूग, ऊस, गहू व फळबाग मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे या हंगामातील पिकांमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र दि. १८ व १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, ऊस व फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे खरिपापाठोपाठ रबी हंगामातील पिकेही नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांच्या हातची नेली आहेत. त्यामुळे वालूर व परिसरातील शंभर एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

भाजप किसान मोर्चाचे साकडे

वालूर व परिसरातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीने उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनावर तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड, भागवत दळवे, महादेव गायके, जीवन ढवळे, शिवहरी शेवाळे, प्रदीप झिंबरे, बळीराम गटकळ, सखाराम दळवे, गोविंद गटकळ आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.