शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
4
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
5
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
6
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
7
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
8
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
9
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
10
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
11
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
12
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
13
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
14
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
15
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
16
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
17
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
19
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
20
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शर्माने तारले, ऑस्ट्रेलियासमोर २६८ धावांचे आव्हान

By admin | Updated: January 18, 2015 13:12 IST

तिरंगी एकदिवसीय मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताने रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या आधारे ५० षटकांमध्ये ८ बाद २६७ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत 
मेलबर्न, दि. १८ - तिरंगी एकदिवसीय मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताने रोहित शर्माच्या दमदार शतकाच्या आधारे ५० षटकांमध्ये ८ बाद २६७ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने १३९ चेंडूत १३८ धावा केल्या असून त्याला सुरेश रैनाने (५१ धावा) मोलाची साथ देऊन भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. 
रविवारी तिरंगी मालिकेत भारताचा सामना यजमान ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक होती. शिखर धवन २ धावा, अजिंक्य रहाणे १२ आणि विराट कोहली अवघ्या ९ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ५९ अशी झाली होती. मात्र त्यानंतर सलामीवीर रोहित शर्माने सुरेश रैनाच्या साथीने संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. मिशेल स्टार्कने सुरैश रैनाला बाद करत ही जोडी फोडली. सुरेश रैना ५१ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधाऱ महेंद्रसिंग धोनीने सावध खेळी करत ३१ धावांमध्ये १९ धावा केल्या. मात्र मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला व स्टार्कने त्याची विकेट घेतली. अक्षर पटेलही शून्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था ६ बाद २३७ अशी झाली. अखेरीस रोहित शर्माने आर. अश्विनच्या मदतीने भारताला २५० चा पल्ला गाठून दिला. रोहित शर्मा १३८ धावांवर असताना स्टार्कच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शर्मा झेलबाद झाला. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यातील सहावे शतक ठोकून पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला. तर भूवनेश्वर कुमारही भोपळा न फोडता माघारी परतला. शेवटच्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या गोलदाजांनी अचूक मारा करत भारतीय फलंदाजांना रोखले आणि ५० षटकांत भारताने आठ गडी गमावत २६७ धावा केल्या. 
ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल स्टार्क हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मिशेल स्टार्कने १० षटकांत ४३ धावा देऊन भारताच्या सहा विकेट घेतल्या. तर गुरिंदर संधू आणि जेम्स फॉल्कनरने प्रत्येकी एक विकेट घेतली.