शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

भारत टी-२० विश्वचषकाचा प्रबळ दावेदार

By admin | Updated: October 14, 2015 23:52 IST

टीम इंडियाची अलीकडची कामगिरी खराब आहे; पण पुढील वर्षी आपल्याच खेळपट्टीवर आयोजित होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा अन्य संघांसोबतच भारतही प्रबळ दावेदार

हैदराबाद : टीम इंडियाची अलीकडची कामगिरी खराब आहे; पण पुढील वर्षी आपल्याच खेळपट्टीवर आयोजित होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा अन्य संघांसोबतच भारतही प्रबळ दावेदार असल्याचे मत वेस्ट इंडीजचा मातब्बर फलंदाज ब्रायन लारा याने व्यक्त केले आहे.भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ ने गमावली. येथे एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या लाराने पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी तो म्हणाला, वेस्ट इंडीज संघाबाबतही लाराने मत मांडले. सध्याच्या विंडीज संघाचा मेंटॉर म्हणून भूमिका वठविण्याचा विचार आहे काय, असे विचारताच तो म्हणाला, ‘‘मी मेंटॉर किंवा कोच ही भूमिका स्वीकारली तरी काही विशेष फरक पडेल, असे मला वाटत नाही. समस्या गंभीर आहे आणि तिची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. आमच्याकडे पायाभूत सुविधा फारच तोकड्या असून, प्रशासकीय स्तरावरील कामही सुमार आहे. अशा वेळी कुणी जादूची कांडी फिरवून राष्ट्रीय स्तरावर बदल घडवून आणेल असे वाटत नाही.’’तो पुढे म्हणाला, ‘‘माझ्या मते, विंडीजकडे जगात सर्वांत प्रभावी खेळाडू आहेत; पण त्यांना साधारण दर्जाचे खेळाडू बनविण्यात येते. आमच्याकडे चांगल्या प्रशासनाची गरज आहे. मी काही करू शकतो; पण त्यासाठी पायाभूत स्तरावर सुधारणा घडवून आणावीच लागेल.’’ तू वेळेआधी निवृत्ती घेतली असे वाटते का, या प्रश्नाच्या उत्तरात लारा म्हणाला, ‘‘मी एक-दोन विक्रम आणखी नोंदवू शकलो असतो; पण विक्रमासाठी खेळलो नाही. १२ हजार धावा महत्त्वाच्या नाहीत. मी ज्या संघांविरुद्ध खेळलो, त्यांच्यासोबत खेळाचा आनंद लुटला.’’ मला भारतातील प्रत्येक शहर आवडते. क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहाचे नवल वाटते. सचिन, लक्ष्मण, द्रविड, धोनी, कोहली हे क्रिकेटला समर्पित असलेले मित्र मी भारतात मिळविले, याचा आनंद वाटतो, असे लाराने आवर्जून सांगितले. (वृत्तसंस्था)