शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

धोनीने दिले चोख प्रत्युत्तर

By admin | Updated: October 26, 2016 00:54 IST

बिहारचे माजी कर्णधार व देशातील सर्वोत्तम क्युरेटर दलजितसिंग यांनी मोहाली सामन्यात वन-डेसाठी चांगली खेळपट्टी तयार केली. खेळपट्टीवर चेंडू ज्या वेगाने येत होता;

- सुनील गावसकर लिहितो़...बिहारचे माजी कर्णधार व देशातील सर्वोत्तम क्युरेटर दलजितसिंग यांनी मोहाली सामन्यात वन-डेसाठी चांगली खेळपट्टी तयार केली. खेळपट्टीवर चेंडू ज्या वेगाने येत होता; त्यामुळे फलंदाजांना सहज खेळता येत होते. खेळपट्टीवर हिरवळ असल्यामुळे वेगवान गोलंदाज व मनगटाच्या बळावर फिरकी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना विकेट घेण्यास मदत मिळाली. त्यामुळेच लेग स्पिनर अमित मिश्राला रॉस टेलर व ल्युक रोंची यांच्यासारख्या फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवता आला.धर्मशाला व दिल्लीतील फिरोजशाह कोटलावर फलंदाजांनी आपल्या चुकीमुळे विकेट बहाल केल्या. मोहालीमध्ये टॉम लॅथम व रॉस टेलर यांच्या चांगल्या फलंदाजीनंतर जिम्मी निशाम व मॅट हेन्री यांनी नवव्या विकेटसाठी उपयुक्त भागीदारी करून येथे मोठी खेळी करणे शक्य असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या चमकदार खेळीमुळे न्यूझीलंडने सन्मानजक धावसंख्या उभारली आणि गोलंदाजांना काही करण्याची संधी मिळवून दिली. पाहुण्यांनी दिल्लीमध्ये यजमान संघाला २३६ धावांत रोखले होते. जर क्षेत्ररक्षकांची साथ लाभली असती, तर मोहालीमध्येही संघाला विजय मिळविण्याची संधी होती. क्रिकेट रंगतदार खेळ आहे, याची प्रचिती स्लिपचा स्पेशालिस्ट क्षेत्ररक्षक रॉस टेलरने विराट कोहलीचा एक सोपा झेल सोडल्यानंतर आली. भारतीय उपकर्णधाराने मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेऊन कर्णधार धोनीच्या साथीने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोहलीने शतकी खेळीदरम्यान आकर्षक फटके मारले. विराटच्या शतकी खेळीनंतर टेलरसाठी केवळ सहानुभूती व्यक्त करता येईल.धोनीने मोहालीत शानदार खेळी करून आपल्या स्थानाबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले. त्यासोबत त्याने टीकाकारांनाही गप्प केले. दरम्यान, अशा बाबीचा भारतीय कर्णधारावर काही प्रभाव पडत नाही आणि अनुभवाच्या जोरावर संघाला निर्धारित लक्ष्य गाठून देण्यात यशस्वी ठरतो. सलामी जोडीचे अपयश भारतीय संघासाठी सर्वांत मोठी चिंतेची बाब आहे. आतापर्यंत या जोडीला संघाला अपेक्षित यश मिळवून देता आलेले नाही. नव्या चेंडूने पांड्याला मोहालीमध्ये छाप सोडता आली नाही, यादवने चांगला मारा केला तर केदार जाधवने बळी घेऊन धोनीच्या चाणाक्ष कर्णधारपदाची प्रचिती दिली. खेदाची बाब ही आहे, की जे दुसऱ्याकडून निर्देश घेतात आणि कर्णधारपदाबाबत काही माहिती नसते ते धोनीला कर्णधारपदावरून हटविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच म्हटले जाते, की मेरा भारत महान ! (पीएमजी)