शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

आश्विनपासून सर्वांत अधिक धोका : प्लेसिस

By admin | Updated: November 3, 2015 03:59 IST

टी-२० आणि वन-डे सामन्यांची मालिका जिंकल्यानंतरही पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला आगामी कसोटी मालिकेत भारतातील फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत चिंता सतावत

मोहाली : टी-२० आणि वन-डे सामन्यांची मालिका जिंकल्यानंतरही पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला आगामी कसोटी मालिकेत भारतातील फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत चिंता सतावत आहे. आगामी मालिकेत आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनला खेळणे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान राहील, असे मत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू ुप्लेसिसने व्यक्त केले.आगामी कसोटी मालिकेत खेळपट्ट्या यजमान संघासाठी अनुकूल राहतील अशी आशा आहे का, याबाबत ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल राहील, अशी आशा आहे आणि त्यानुसार योजना आखली जाईल. माझ्या मते, भारतीय क्रिकेट पूर्वीच्या तुलनेत अधिक आक्रमक झाले आहे. सुरुवातीला भारतातील खेळपट्ट्याकडून तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती; पण आता पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर चेंडू वळायला सुरुवात होते.’’गुरुवारपासून प्रारंभ होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सोमवारी आयएस बिंद्रा पीसीए स्टेडियममध्ये सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘याचा अर्थ, कसोटी सामना ५ दिवस चालणार नाही. कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपणार असेल, तर त्यादृष्टीने योजना आखून आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.’’ दुखापतीतून सावरल्यानंतर कसोटी मालिकेत पुनरागम करीत असलेल्या आश्विनच्या आव्हानाला सामोरे जाणे महत्त्वाचे ठरेल, असेही ड्युप्लेसिसने सांगितले. ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘आश्विन जागतिक दर्जाचा फिरीकपटू आहे; पण टी-२० मालिकेत आम्ही त्याला यशस्वीपणे सामोरे गेलो आहोत. आता कसोटी क्रिकेटचा प्रश्न आहे. येथे त्याला अधिक टर्न मिळेल.’’ड्युप्लेसिसने सांगितले, ‘आश्विनला खेळणे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान आहे; पण आम्ही त्यासाठी योजना आखली आहे. आश्विनला आम्ही कसे खेळतो, यावरच या मालिकेचा निकाल अवलंबून राहील.’’मोहालीच्या खेळपट्टीबाबत ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘खेळपट्टी कोरडी भासत आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळेल, अशी आशा आहे. सध्या खेळपट्टी तशीच वाटत आहे.’’ ड्युप्लेसिसने मुंबईत खेळल्या गेलेल्या पाचव्या व अखेरच्या वन-डे सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीवर टीका करणाऱ्या भारतीय संघव्यवस्थापनावर नेम साधला.(वृत्तसंस्था) भारतीय संघाने विजय मिळविला असता तर तक्रार केली असती, असे वाटत नाही. या दौऱ्यात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. मोहालीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारताचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाच्या यशात वेगवान गोलंदाज मोर्ने मोर्कलची भूमिका महत्त्वाची ठरेल.- फाफ डू प्लेसिस